नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..

24 तासात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू…

बारामती: बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार […]

अधिक वाचा..

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

त्या गावात मृत्यूचे तांडव, अवघ्या दीड महिन्यात 24 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांकडून देवाचा धावा, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल कानपुर: अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले […]

अधिक वाचा..

पुण्यात जावयाने सासुरवाडीला येत शिवीगाळ केल्याने सासऱ्याने जावयाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये सासऱ्याने जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातल्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली. जावयाने सासरवाडीमध्ये येत सासरा आणि सासूला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणानंतर संतप्त झालेल्या सासऱ्याने जावयाचा गळा दाबला आणि त्याला जागीच संपवलं. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस सध्या तपास […]

अधिक वाचा..

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू…

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते. राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

आधी सासू-सासरे अन् आता नवऱ्याचा मृत्यू…

मेरठ: मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला. मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या […]

अधिक वाचा..

MPSC ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू

पुणे: किनगाव (जि. लातूर) येथील एका व्यापाऱ्याचा एकुलता एक २३ वर्षांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयाेग (एमपीएससी) परीक्षेची तयारी गत दीड वर्षापासून करत होता. दरम्यान, ताे मित्रांसोबत कोकणात फिरण्यासाठी गेला असता, ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. मयत युवकाचे नाव महेश रमेश गुट्टे असे आहे. किनगाव (ता. अहमदपूर) येथील […]

अधिक वाचा..

वर्षा उसगावकर म्हणाल्या मरेपर्यंत लक्ष्याची ती इच्छा पूर्ण झालीच नाही… 

वर्षा उसगावकरांनी सांगितली कुणालाही माहीत नसलेली गोष्ट मुंबई: वयाच्या पन्नाशीतही एव्हरग्रीन दिसणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मराठीतल्या वंडर गर्ल असा टॅग दिला गेला. त्यांनी एकेकाळी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलं. आताही वर्षा मराठी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. त्या अनेक वर्षांपूर्वी ‘दुनियादारी’ चित्रपटात दिसल्या होत्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक टॉपच्या मराठी आणि हिंदी अभिनेत्यांसोबत […]

अधिक वाचा..

जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा देणार म्हणून अटकळी बांधण्यात येत होत्या. दरम्यान जयंत पाटील यांच्या कारकि‍र्द देखील चर्चली जात आहे. राजाराम पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतले होते. त्यामुळे ते आजही शरद पवार यांच्यासोबत आहेत. जयंत […]

अधिक वाचा..