एसीचा भीषण स्फोट झाल्याने विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण…

सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या […]

अधिक वाचा..

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पुणे: मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले. या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे. […]

अधिक वाचा..

पुण्यात महिलेची छेड काढल्याचा संशयावरून बेदम मारहाणीत ३५ वर्षीय युवकाचा खून

पुणे: नात्यातील महिलेची छेड काढल्याने केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा खून झाला आहे. ही घटना चंदननगरमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत घडली. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय २१), समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २१, दोघे रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना अटक केली साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव (वय ३५, […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा..

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यान नवऱ्याच्या डोळ्यासमोर बायकोचा मृत्यू…

मुंबई: वाहतूक कोंडी ही राज्यातील सर्वच शहरांमधील मोठी समस्या आहे. मुंबई तसंच उपनगरात हा प्रश्न नेहमीच गंभीर असतो. घोडबंदर रोड तर वाहतूक कोंडीसाठी बदनाम आहे. ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यामुळे एका 49 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. छाया कौशिक पुरव असं या महिलेचं नाव आहे. त्या पालघर तालुक्यातल्या सफाळे, मधुकर नगर […]

अधिक वाचा..

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..

24 तासात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू…

बारामती: बारामतीच्या रस्त्यावरील भयानक वेगाने काल एका निष्पाप कुटुंबातील तिघाजणांचे बळी घेतल्यानंतर ओंकार आचार्यच्या वडिलांचेही आज पहाटे निधन झाले. राजेंद्र श्रीनिवास आचार्य हे निवृत्त शिक्षक होते. काल बारामतीच नाही, तर संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणारी घटना बारामतीत घडली. कोणाच्याही अध्यात मध्यात नसलेले आचार्य कुटुंब संपले. काल दिवसभर बारामती सुन्न होती. संध्याकाळच्या साडेसात वाजता च्या वेळी ओंकार […]

अधिक वाचा..

आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं वृद्धापकाळाने त्यांच्या गावी निधन झालं होत. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्या दरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

त्या गावात मृत्यूचे तांडव, अवघ्या दीड महिन्यात 24 जणांचा मृत्यू

ग्रामस्थांकडून देवाचा धावा, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल कानपुर: अवघ्या दोन हजाराच वस्तीचे हे गाव. पाच-सहा गल्ल्या, मोठे दोन-तीन चौक, मंदिर, पार, पंचायत आणि आजुबाजूला शेतवस्ती. इतर गावांप्रमाणेच येथील दैनंदिन व्यवहार सुरू होते. पण गेल्या दीड महिन्यात या गावातील वातावरण बदलले आहे. या दीड महिन्यात येथील 24 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. जणू पंचकच लागले […]

अधिक वाचा..