पंजाबमध्ये भाजपचा ‘एकला चलो’चा नारा; २०२७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

अकाली दलासोबतची युती संपुष्टात; भाजपकडून सर्व ११७ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा पंजाब: पंजाबच्या राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाने २०२७ ची पंजाब विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अकाली दलासोबत पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लन यांनी पक्ष सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांत स्वतःचे उमेदवार […]

अधिक वाचा..

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची […]

अधिक वाचा..

सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला. सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी […]

अधिक वाचा..

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना गटातील भूमिका स्पष्ट

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत राजकीय चर्चा तीव्र झाली आहे. या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटातही वेगवेगळ्या भूमिका दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पूर्वी शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा असल्यास त्यावर चर्चा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकाल! भाजपचा दबदबा, महायुतीला घवघवीत यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय सत्याचा नाही, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा टोला

नागपूर: चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून उद्या काँग्रेसचा महापौर होणार असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज […]

अधिक वाचा..

संकटातही संघटनशक्ती; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. विशेषतः पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल कसा लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. अजित पवार 9 फेब्रुवारीला ‘कमबॅक’ करणार, अशा आशयाचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच प्रत्यक्ष निवडणूक निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे कल स्पष्ट; भाजप आघाडीवर

सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..

१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यात ६६.२८ टक्के मतदान मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. […]

अधिक वाचा..