बारामती परिमंडलात ५१ टक्के वीजग्राहक ऑनलाईन तर ४९ टक्के अजूनही रांगेतच

बारामती: चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्यात भारताचे चांद्रयान-३ लवकरच यशस्वी होईल. डिजीटल इंडियासाठी हा गौरवाचा क्षण असेल. पण याच डिजीटल इंडियात व महाराष्ट्रात तब्बल ४९ टक्के वीजग्राहक आजही पारंपरिक पद्धतीने स्वत:चा वेळ व पैसा वाया घालत रांगेत उभे राहून वीजबिल भरत असल्याचे वास्तव आहे. बारामती परिमंडलात शेतीचे ग्राहक वगळता २० लाख ३४ हजार ग्राहक आहेत. ज्यापैकी […]

अधिक वाचा..
sakshi aahuja delhi

महिलेने पाण्यापासून वाचण्यासाठी खांब पकडला अन् एका क्षणात…

नवी दिल्लीः राजधानी दिल्लीसह देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. पावसामुळे नवी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. साक्षी आहुजा नावाची महिला पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. तिच्यासोबत 2 महिला आणि 3 मुले होती. साक्षीला चंदीगडला जायचे होते. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने विद्युत तारा व खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

शिरुर (तेजस फडके): शिरुर परीसरात काल गुरुवार (दि. 8) रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. सोने सांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव, कारेगाव, फलके मळा, करंजावणे, गणेगाव परिसरात पावसाबरोबरचं वाऱ्यांचा जोर खुप होता. याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले की विजेचे खांब पडल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शिरुर तालुक्यात सूरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे […]

अधिक वाचा..

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विजेच्या खांबावर टेम्पो आदळल्याने नागरिक अंधारात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथे पुणे नगर महामार्गावर पहाटेच्या सुमारास 1 टेम्पो विजेच्या खांबावर आढळल्याने विजेचा पूर्ण खांब पडून व वीज वाहक तारा तुटल्याने सर्व नागरिकांना अंधारात राहून उष्णतेचा सामना करण्याची वेळ आली. मात्र विद्युत वितरण विभागाच्या तत्परतेने अनर्थ टळला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून पहाटेच्या सुमारास एम […]

अधिक वाचा..

शिक्रापुरकर विजेच्या आशेवर तर अधिकारी फिल्डवर

अधिकाऱ्याने स्वतः अंधारात राहुन सोडवला विजेचा प्रश्न शिक्रापूर (शेरखान शेख): शासकीय कार्यालय व शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे काम म्हणजे दिवसा दहा ते पाच असे म्हटले जातें, मात्र पोलीस चोवीस तास काम करत असताना आता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील रात्रंदिवस काम करत असल्याने शिक्रापूरचे ग्रामस्थ विजेच्या आशेवर मात्र विद्युत वितरणचे अधिकारी व कर्मचारी फिल्डवर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार… शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे. शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा […]

अधिक वाचा..

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या…

मुंबई: अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना त्यांची वीज खंडित केली जाते. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती दिवसा ठरविक वेळेत वीज उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आणि […]

अधिक वाचा..

महावितरणने दाखल केलेला वीज दरवाढ प्रस्ताव पूर्णपणे रद्द करावा; नाथाभाऊ शेवाळे

राज्यातील वीजदर कमी करून अन्य राज्यांतील दरांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर आणावा  मुंबई: महावितरण कंपनीने यावेळी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूटीच्या भरपाईची मागणी केलेली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी सरासरी ३७% दरवाढीची आहे. स्थिर व/वा मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक… मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..