शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे.

शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा सामना शेतकरी गेली अनेक वर्ष करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे बेट भागातील जांबुत, पिंपरखेड परीसरातील ४ जणांना आपले प्राण गमवावा लागले आहे. तर शेकडो पशूधनावर हल्ला करून ठार केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहीले असून रात्रीच्या वेळी अक्षरश: जीव धोक्यात घालून शेतीला पाणी दयावे लागत आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी गेल्यावर तो परत सुखरुप घरी येईल की नाही याची चिंता घरच्यांना कायम सतावत असते.

बिबटयाच्या, सर्पदशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेताला दिवसा पाणी देण्यासाठी दिवसा वीज हवी असून वारंवार मागणी होऊनही महावितरण कंपनी या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. शिरूर तालुक्यातील बेट भाग हा बिबट प्रवण क्षेत्र परिसर आहे. बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीत वाढला असून जीव मुठीत धरुन रात्रपाळीत शेताला पाणी दयावा लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील आमदार, खाजदार व इतर राजकीय नेत्यांनी अतिशय प्रभावीपणे दिवसा विजेची मागणी केली असून अद्याप या मागणीला महावितरणकडून केराची टोपली दाखवली जात आहे. अजून किती जणांचे बळी गेल्यावर दिवसा वीज देणार असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारत आहे.बिबट्याच्या हल्ल्याची घटना जीवावर बेतली तर महावितरणचे संबंधीत अधिकारी जबाबदार असतील.अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

शिरूर तालुक्यातील बेट भाग हा बिबट प्रवण क्षेत्र परिसर आहे. यामुळे या परिसरात शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, अशी मागणी वारंवार करूनही ती पूर्ण न करता वीज कनेक्शन कट करण्याचे धोरण अवलंबविले गेले आहे. बिबट्याचा वावर हा मानवी वस्तीत वाढला असून घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या हल्ल्याची घटना जीवावर बेतली तर महावितरणचे संबंधीत अधिकारी जबाबदार असतील, अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.