महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विभागाला दिले. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर माहिती […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय..

मुंबई: अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घतल्यानंतर आज शिंदे-फडणीस सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. काल (दि. 4) रोजी पार पडलेल्या या महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव […]

अधिक वाचा..

शिंदोडी गावची वेदांती वाळुंज राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) राज्यात पहिली

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिंदोडी गावची रहिवासी असणाऱ्या आणि बाभूळसर बुद्रुक या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी कु वेदांती वैभव वाळुंज हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गुणवंत शोध परीक्षेत (NSSE) 200 पैकी 200 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वेदांतीला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती प्रतिभा […]

अधिक वाचा..

कृषी पर्यवेक्षक परीक्षेत अरुण जोरी राज्यात प्रथम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कृषी विभागात कार्यरत असणारे कृषी सहाय्यक अरूण भागाजी जोरी यांनी नुकत्याच आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कृषीपर्यवेक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहे. घेण्यात आलेल्या या परीक्षेमधून पुणे विभागात एकूण ११२ जागांसाठी तर राज्यात एकूण ७५९ जागांसाठी (दि. ३) एप्रिल […]

अधिक वाचा..

पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार; दिपक केसरकर मुंबई: केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत शालेय […]

अधिक वाचा..

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम

मुंबई: माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे. माजी […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेत्याचा बहुमान…

नवी दिल्ली: महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात […]

अधिक वाचा..