भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ झाला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सरकारवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने काढली […]

अधिक वाचा..

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ची घोषणा. नागपूर: राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असून कर्जमाफीचा गाजावाजा करताना दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकरी वंचित […]

अधिक वाचा..

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित […]

अधिक वाचा..

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करणारा राज्य सरकारचा नवीन जीआर अन्यायकारक असून तो तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मुंबई: “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारातून राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे,” असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले. वरळी विधानसभा मतदारसंघात […]

अधिक वाचा..

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र शासन आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकभवन, मुंबई येथे आयोजित या सोहळ्यात कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच वीरसैनिकांच्या वीरपत्नी आणि वीरमातांचा […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]

अधिक वाचा..

मतांसाठी ‘लाडकी बहीण’, सत्तेनंतर ‘अपात्र’; सरकारने महिलांचा विश्वासघात केल्याचा काँग्रेसचा आरोप

‘लाडकी बहीण’ योजनेत लाखो महिलांना अपात्र ठरवणे, ई-केवायसीमुळे लाभ रोखणे आणि ₹२,१०० चे आश्वासन पूर्ण न करणे यावर काँग्रेसचे टीकास्त्र  मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी महायुती सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. ‘मतांसाठी महिलांना “लाडकी बहीण” म्हणून संबोधले, […]

अधिक वाचा..

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध […]

अधिक वाचा..

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..