अर्थसंकल्पीय चर्चेत वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

महसूल, शिक्षण, वन व वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश मुंबई: विधानसभेत अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला जोरदार धारेवर धरले. विविध विभागांतील गैरव्यवहार आणि प्रशासनातील ढिसाळपणाची त्यांनी सभागृहात सविस्तर पोलखोल केली. महसूल विभागावर बोलताना राज्यातील […]

अधिक वाचा..

राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत करण्यात आली. राज्यातील सद्यस्थिती […]

अधिक वाचा..

गृहस्वामिनी गॅसवर! महिलादिन तर रोजचाच… अशी महागाई नको सरकार!

मुंबई: देशाचा असो की राज्याचा अर्थसंकल्प, कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात गृहस्वामिनीचे लक्ष सर्वप्रथम कशाकडे असते? कांदा, बटाटा, भाजीपाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅसच्या किमतीकडे. आजही प्रत्येक घरात महागाईचा भडका किती वाढणार याचीच चर्चा आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरातील चढ-उतारावरही सर्वसामान्यांचे लक्ष आहे. प्रश्न अनेक आहेत… पण उत्तर एकच दिले जाते […]

अधिक वाचा..
sanjeev-palande-pabal

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे शिबीरातून होणार निराकरण : संजीव पलांडे

शिरूर : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन नोंदी, विविध दाखले तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित […]

अधिक वाचा..

हा महाराष्ट्राचा नव्हे, MMRDA चा अर्थसंकल्प;  विजय वडेट्टीवर यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई: विधानसभेत सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा असून त्यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर उपरोधिक निशाणा साधला. अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

कामगार साहित्य वाटपातील गोंधळावर सरकारला धारेवर; विजय वडेट्टीवार यांचा मुदतवाढीवर सवाल

मुंबई: अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्य वाटप करताना झालेल्या गोंधळावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरत कामगार विभागातील गैरव्यवहार आणि एका अधिकाऱ्याला मिळालेल्या नियमबाह्य मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

जनतेच्या दारी शासन! ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाची मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

मुंबई: जनतेला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियानाच्या (टप्पा-१) मुख्य उद्देश असून, या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा स्पष्ट सूचना मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या. या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे […]

अधिक वाचा..

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. […]

अधिक वाचा..

आंदोलन थांबवा; इ-चलानांवर सरकारचा सकारात्मक सूर; प्रताप सरनाईक

मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूकदारांना ५ तारखेपासूनचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, “इ-चलनांच्या कारवाईबाबत वाहतूकदारांच्या भावना […]

अधिक वाचा..

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीचे […]

अधिक वाचा..