बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत असून, या विकासाच्या प्रवासात सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे […]

अधिक वाचा..

‘आदिवासींच्या हक्काचा पैसा जातो कुठे?’; आश्रमशाळांच्या कारभारावर वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि त्यासाठी मंजूर झालेला निधी पूर्णपणे खर्च होत नसेल, तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काचा पैसा नेमका कुठे जातो, असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामागे सरकारकडून सुमारे दोन हजार रुपये खर्च […]

अधिक वाचा..

धर्माच्या राजकारणात ओबीसींना अडकवून हक्कांचे प्रश्न दडपण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी […]

अधिक वाचा..

ओबीसींची संख्या ६० टक्के असताना २८-३० टक्के दाखवणे खपवून घेणार नाही; वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

नागपूर: ईम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक लोकसंख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे ६० टक्के असताना ती २८ ते ३० टक्के असल्याचे दाखवणे खपवून घेतले जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. […]

अधिक वाचा..

शेणातून होणार लाखोंची कमाई! सरकार खरेदी करणार बायोगॅस; ‘गोवर्धन’ योजनेला 23,731 कोटींची मंजुरी

नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23,731 कोटी रुपयांच्या ‘गोवर्धन’ (GOBARdhan) राष्ट्रीय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तयार होणारा कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) सरकार निश्चित दराने खरेदी करणार असल्याने उत्पादकांना बाजारपेठेची चिंता […]

अधिक वाचा..

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर ‘डबल ढोलकी’ वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप अंतरवाली सराटी: मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी गुरुवारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत, अवैध ठरवलेली […]

अधिक वाचा..

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही, तर जनतेच्या सार्वभौम इच्छेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे. सरकारच्या निर्णयांची छाननी, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद आणि शासनाला उत्तरदायी धरण्याची प्रक्रिया संसदेतूनच घडते. त्यामुळे संसदेत चर्चा होणे आणि सरकारने जनतेच्या प्रतिनिधींसमोर आपल्या निर्णयांचा हिशेब देणे, ही […]

अधिक वाचा..

कुणबी प्रमाणपत्र वाटपामागे कोणाचा दबाव? विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

ओबीसी आरक्षण, मोहन भागवतांचा युवक संवाद आणि आदिवासी विभागाच्या ६०० कोटींच्या थकीत देण्यांवरही सरकारवर हल्लाबोल नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. मराठवाड्यातील तीन जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर ही […]

अधिक वाचा..

मुंबईच्या पुनर्विकासाला गती; झोपडपट्टी पुनर्वसन, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा भर

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणारे गृहनिर्माण, स्वच्छता आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांवर राज्य सरकारने विशेष भर दिला आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित घरे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्पांना गती दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, […]

अधिक वाचा..

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या ‘मंडल यात्रा’च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसींची जातनिहाय जनगणना, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी केली. भाजप ओबीसी समाजाची मते घेतो, मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, असा आरोप करत वडेट्टीवार […]

अधिक वाचा..