रांजणगाव गणपतीत किसान जागृती यात्रेत सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कन्याकुमारी ते काश्मीर हि देशव्यापी किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रांजणगावात दाखल होताच हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन त्याचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशा, घोषणाबाजी आणि भगव्या-हिरव्या पताकांनी परिसर भरुन गेला होता. या यात्रेचे नेतृत्व वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून ७ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान देशभर शेतकरी […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका व्यापार करारावरून देशात खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीती, सरकारकडून अद्याप तपशील गोपनीय

मुंबई: भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय आणि आर्थिक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारने या कराराला ‘ऐतिहासिक’ आणि ‘रणनीतिक’ असे संबोधले असले, तरी कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला विश्वासात न घेता आणि शेतकरी संघटनांशी सखोल चर्चा न करता करण्यात आलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald […]

अधिक वाचा..

आरक्षणासाठी आयोग स्थापन; बंजारा समाजाच्या उन्नतीस सरकार कटिबद्ध

संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन […]

अधिक वाचा..

वीजदर कपातीच्या आश्वासनावरून सरकारवर टीका; १६% दरवाढीचा आरोप; अतुल लोंढे

मुंबई: राज्यात वीजदर कमी करण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. वीजदर कमी होण्याऐवजी ते सुमारे १६ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, […]

अधिक वाचा..

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम […]

अधिक वाचा..

मोफत उपचारांना ब्रेक! शासकीय रुग्णालयांत पुन्हा शुल्क; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत दर लागू

मुंबई: अडीच वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पूर्ण मोफत उपचार’ धोरणाला आरोग्य विभागाने अखेर यू-टर्न घेतला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता पुन्हा उपचारांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी ५ रुपये, तर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजावे […]

अधिक वाचा..

लोकसभा दणाणली! कळीच्या मुद्द्यांवर चर्चेला टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.” त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो […]

अधिक वाचा..

२५ कोटींचा अतिवृष्टी अनुदान महाघोटाळा! सरकारी बाबूच बनले ‘शेतकरी’, ३१ जणांना अटक

जालना: नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारी तिजोरीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार करण्यात आल्याप्रकरणी ३१ आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्यात चक्क तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा सहभाग असल्याने महसूल विभागात […]

अधिक वाचा..