राज्यातील दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता तर दोन ठिकाणी सत्तेत सहभागी; हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे नेतृत्व पोरके; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.अजित दादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते प्रभावीपणे सोडवण्याच्या […]

अधिक वाचा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर

मणिकर्णिका घाटावरील तोडफोडीची करणार पाहणी मुंबई: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या पवित्र मणिकर्णिका घाटाची बुलडोझरद्वारे तोडफोड केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या कारवाईत घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंग उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या सांगता सभेतून भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही […]

अधिक वाचा..

देशाला आज काँग्रेस विचाराची नितांत गरज; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर मुंबई: नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदार प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री आणि तत्त्वनिष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर […]

अधिक वाचा..

संविधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय, समता व बंधुतेची हाक दिली मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे परंतु या संवैधानिक मुल्ल्यांच्या विरोधात काही शक्ती डोके वर काढत आहेत. या शक्तींच्याविरोधात संघर्ष अनिवार्य असून संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी बळकटी मिळावी, यासाठी चैत्यभूमीवर […]

अधिक वाचा..

भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर दंडेलशाही, लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे असा आरोप करणाऱ्या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरु […]

अधिक वाचा..