शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर महायुती सरकार ठाम; एकनाथ शिंदे

माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कामांवर विश्वास व्यक्त करत अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून उर्वरित प्रश्नांवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

महागाई, नोकरभरती आणि शेतकरी प्रश्नांवरून अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्यातील वाढती महागाई ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती किंवा आखाती युद्धामुळे नसून राज्य सरकारच्या चुकीच्या आणि दिशाहीन धोरणांचा परिणाम असल्याचा घणाघात माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या वतीने मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी महागाई, रखडलेली नोकरभरती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. महागाईसाठी प्रत्येकवेळी आखाती युद्धाला जबाबदार धरण्यावर टीका […]

अधिक वाचा..

चेंबूर बस दुर्घटनेची शिंदेंकडून गंभीर दखल; जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांच्या सूचना

मुंबई: चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून काही विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने आणि योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शिंदे यांनी सांगितले की, त्यांनी राहुल शेवाळे आणि आमदार काते यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून दोघेही घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमी […]

अधिक वाचा..

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही आमदार Satyajeet Tambe यांनी दिली. शिरपूर येथे आयोजित नाशिक विभागातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळा संस्थाचालकांच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या वतीने आयोजित या बैठकीत आश्रमशाळांसमोरील आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींचा सविस्तर आढावा […]

अधिक वाचा..

फेरीवाला प्रश्नावर उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

५ आठवड्यांत ९९ हजार फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचे आदेश मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला कडक शब्दांत फटकारले असून, न्यायालयाने संरक्षित ९९ हजार फेरीवाल्यांना पाच आठवड्यांत ओळखपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत “तीच तीच कारणे देताय, हे म्हणजे पालथ्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान […]

अधिक वाचा..

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक, आर्थिक आणि कामगार क्षेत्रातील स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र आज त्यांच्या स्वप्नांप्रमाणे घडतो आहे का, यावर चर्चा रंगत आहे. राज्यात […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या प्रश्नांवर बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राहणारे नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर गेल्या सहा दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कल्याण च्या प्रमुख बाजारात आणि नागरिकांना गरज असल्या ठिकाणी मोफत सार्वजनिक सौचालय व मुतारी उभारण्यात यावी, रुक्मिणी बाई दवाखाना नागरिकांसाठी सुसज्ज करावेत ज्यानी […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांसमोर तिहेरी कसोटी; नेतृत्व, विलिनीकरण आणि चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. दुःखद घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्याच दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. या घाईबद्दल राजकीय वर्तुळात टीका झाली असली तरी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया […]

अधिक वाचा..