ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा प्रकल्पांचाही शुभारंभ ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सुमारे ₹२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील दीड वर्षांत तीन हात नाका […]

अधिक वाचा..

ओपन विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! फीमध्ये 50% ते 100% सवलत; जाणून घ्या पात्रता, अटी आणि अर्ज प्रक्रिया

मुंबई: उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची फी सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत खुल्या (Open) तसेच एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना उत्पन्न आणि अभ्यासक्रमानुसार 50 ते 100 टक्क्यांपर्यंत फी सवलतीचा लाभ मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 […]

अधिक वाचा..

दुबार पेरणीचा संपूर्ण खर्च शासन उचलणार; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बावनकुळे यांची घोषणा

मुंबई: बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या किंवा पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च आता जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयानुसार, बियाणे न उगवल्यास किंवा पीक पूर्णपणे वाया गेल्यास पात्र शेतकऱ्यांना शासनामार्फत नवीन बियाणे उपलब्ध […]

अधिक वाचा..

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जून होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद तसेच विविध प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री […]

अधिक वाचा..

होर्मुज खाडीत पुन्हा जहाजांची हालचाल सुरू; जगाला मोठा दिलासा

मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा सुरू झाल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग बंद झाल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत […]

अधिक वाचा..

महसूल विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा; चंद्रशेखर बावनकुळे

‘महाराजस्व समाधान शिबीर’ लोकाभिमुख उपक्रम मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासनाच्या दिशेने काम करत असल्याचे सांगत, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ हे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहावे शिबिर अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथे आयोजित […]

अधिक वाचा..

पीसीएम-पीसीबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; दुसऱ्या प्रयत्नासाठी नोंदणीसाठी २३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी करण्याची अंतिम मुदत २३ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने येणाऱ्या विनंत्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या निर्णयानुसार, इच्छुक विद्यार्थ्यांना २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री […]

अधिक वाचा..