जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने ‘विश्वगुरु’ व्हावे; राज्यपाल रमेश बैस

मुंबई: जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने ‘विश्वगुरु’ व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.    मुंबईतील सिंगापूर इंटरनॅशनल स्कुल मुंबई या संस्थेच्या २०२३ वर्गाचा पदवीदान समारंभ राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत संस्थेच्या दहिसर मुंबई येथील शैक्षणिक संकुलात शनिवारी (दि. २०) संपन्न झाला. त्यावेळी […]

अधिक वाचा..

आता महाविकास आघाडीचेच दिवस येणार; धनंजय मुंडे

परळी: महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या […]

अधिक वाचा..

सरसकट सर्वांची फेरपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक […]

अधिक वाचा..

आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार… मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वरमध्ये दंगल घडवण्याचा भाजपाचा कुटिल डाव गावकऱ्यांनी उधळून लावला…

मुंबई: महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याच्या प्रकरणाला भाजपाशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे. त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून गावातील वातावरण शांत आहे […]

अधिक वाचा..

आत्मवंचना करणारे फडणवीस सर्वसामान्यांना फसवू शकत नाहीत…

मुंबई: माजी मुख्यमंत्री व नाईलाजास्तव झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे “मी पुन्हा येईन फेम” आहेत, त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला. नंतरची वक्तव्ये पाहिली तर दिव्यांगालाही किव येईल, अशी आहेत. एकनाथ शिंदेंचे आपण समजू शकतो त्यांनी मिंधेपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यांची अवस्था रक्ताला चटावलेल्या वाघाच्या पाठीवर बसल्यासारखी झाली आहे. वाघ मेल्यानंतरच पाठीवरून उतरलं तरच जगणार, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब…

मुंबई: महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची […]

अधिक वाचा..

पत्रकारांना मारहाण करणाऱ्या राजकीय गुंडांवर पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार कारवाई व्हावी…

मुंबई: चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात दिनांक १३मे रोजी मुंबई महानगर पालिकेच्या महिला स्वयंरोजगार योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात आसपासच्या परिसरातील महिला उपस्थित राहणार होत्या. मा मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे आणि मा उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस येणार असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळणार हे गृहित होत. मात्र सरकारने मध्यंतरी जी आर केला की, दुपारी १ ते ४या वेळेत उन्हाचा तडाखा […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार…

मुंबई: उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत […]

अधिक वाचा..

शिंदे – फडणवीस सरकार घटनाबाह्य नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…

मुंबई: छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश,शिवसेना व ज्यांनी […]

अधिक वाचा..