सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..

गोष्ट भिगवणच्या लेकीची; प्रेमप्रकरणाला राजकीय व धार्मिक वळण, संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर […]

अधिक वाचा..

गेल्या पाच वर्षांत देशात किती सरकारी शाळा बंद? लोकसभेत प्रश्न, शिक्षण मंत्र्यांनी दिले आकडे

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला असून, अनेक शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. या आकडेवारीमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेत उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहारचे […]

अधिक वाचा..

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण? तटकरे यांच्या त्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई: सर्व मतभेद दूर सारत दोन ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले. मराठीच्या मुद्यावर त्यांनी एकला चलो रे ऐवजी ‘आम्ही दोघे भाऊ एक होऊ’ असे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही खेम्यातील नेत्यांनी एकत्रिकरणाचा सूर आळवला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध पण नंतर अनुकूल संकेत दिले […]

अधिक वाचा..

पोलिसांच्या प्रश्नांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात उठवला आवाज

मुंबई: समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात आवाज उठविला. पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, […]

अधिक वाचा..

राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्याची मिरची मात्र भाजपाला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद असून राहुल गांधींनी […]

अधिक वाचा..

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्य दलाचे अभिनंदन, पण युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही

मबई: देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र […]

अधिक वाचा..
farmer

आदिवासी शेतकरी,कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

नागपूर: धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, कष्टकरी,बांधवाच्या विविध मागण्या आणि दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी निघालेल्या बिर्‍हाड मोर्चाचा आवाज धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी विधानसभेत बुलंद केला. आ.कुणाल पाटील यांनी शेतकरी,कष्टकर्‍याच्या मागण्यांचा एल्गार विधानसभेत पुकारला. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्याशोधक शेतकरी सभेचा बिर्‍हाड मोर्चा मुंबईत धडकण्याआधीच शासनाने मध्यस्थी करुन शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्यात […]

अधिक वाचा..