रांजणगाव MIDC मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच कंपन्यांमधील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीने कंपनी प्रतिनिधींची दि ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत समन्वय बैठक रिया मीटिंग हॉल, रांजणगाव MIDC येथे पार पडली. या बैठकीत औद्योगिक परिसरातील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध […]

अधिक वाचा..

‘AI’ म्हणजे ‘आई-माय’; लोकप्रतिनिधींनी ‘झोळी’ नव्हे तर श्रमाचा मार्ग द्यावा!

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा ‘AI म्हणजे आई-माय’ हा विचारप्रधान लेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence पेक्षा ‘AI’चा अर्थ ‘आई’ आणि ‘माय’ असा मांडत लेखकाने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर परखड भाष्य केले आहे. लेखात लोकप्रतिनिधींनी केवळ अनुदान, पॅकेज आणि आश्वासनांच्या ‘झोळ्या’ वाटण्यापेक्षा जनतेला स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी रोजगार, हमीभाव, […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या गुरुवार पासून २ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यशाळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी श्रीचंद्र गार्डन लॉन्स येथे होणार असून १३ मार्चला कार्यशाळेची सांगता होणार आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना मदत करावी

मुंबई: मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही […]

अधिक वाचा..

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला. भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे 

एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे ‘क्षमता बळकटीकरण समारंभ’, कार्यक्रम संपन्न पुणे: एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित ‘क्षमता बळकटीकरण समारंभ, भारत’ या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘विधीमंडळात यशस्वी होण्यासाठी ऊत्तम संसदीय आयुधे’या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आमदार व लोकप्रतिनिधींना संसदीय कार्यपद्धती, प्रभावी कायदेविषयक प्रक्रिया आणि […]

अधिक वाचा..

आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले. विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं […]

अधिक वाचा..

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी सामाजिक जाणीव ठेवून प्रकर्षाने पुढे यावे

मुंबई: जगभरात सर्वच देशांनी मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध देशातील शासनकर्ते आणि विविध लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अनेक पातळ्यांवर यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पर्यावरण, टेकड्यांच्या नाशाकडे जात असलेली विकास प्रक्रिया, नद्यांचे पुनरुज्जीवन, जलव्यवस्थापन अशा विषयांवर भारतात काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर काम […]

अधिक वाचा..

प्रतिनिधीनींनी अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका घ्यावी…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेच्या घोटाळ्यासंदर्भात येत्या वीस मार्च रोजी बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील बोलवण्यात यावे. अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका आपण घेतली पाहिजे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिले. आज लक्षवेधी प्रश्नाअंतर्गत आमदार मा. […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित…

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा मुंबई: काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित […]

अधिक वाचा..