भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ झाला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सरकारवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने काढली […]

अधिक वाचा..

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित […]

अधिक वाचा..

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई: आरक्षण व्यवस्था ही भारतीय संविधानाने सामाजिक न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समाजघटकांना शिक्षण व रोजगारामध्ये प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने निर्माण केली आहे. मात्र बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत आरक्षण व्यवस्थेचा विविध घटकांवर होणारा परिणाम वस्तुनिष्ठपणे तपासून […]

अधिक वाचा..

आरक्षण, बेरोजगारी आणि आंदोलनांवरून राज्यात पुन्हा चर्चा

३० मेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ‘सगेसोयरे’ अंमलबजावणी आणि गुणवंत आरक्षित उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील समावेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. १५ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी पुन्हा आंदोलन करण्याची […]

अधिक वाचा..

महिला आरक्षण उपकार नाही, अधिकार; हर्षवर्धन सपकाळ

‘डिलिमिटेशन’च्या आड अडथळे निर्माण केल्याचा आरोप मुंबई: महिला आरक्षण हा कोणावर केलेला उपकार नसून तो महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असे ठाम मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’च्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “महिला आरक्षणाच्या मुखवट्याआड भाजपा सरकारचा फसलेला डाव” या विषयावरील जाहीर सभेत ते बोलत होते. सपकाळ म्हणाले की, महिला […]

अधिक वाचा..

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. २८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..

मुस्लीम ५% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; सरकार अल्पसंख्याकविरोधी; नसीम खान

मुंबई: राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला खीळ घालणारा आहे, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, २०१४ साली काँग्रेस आघाडी […]

अधिक वाचा..

आरक्षणासाठी आयोग स्थापन; बंजारा समाजाच्या उन्नतीस सरकार कटिबद्ध

संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शुभारंभ वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन […]

अधिक वाचा..

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; छत्रपती संभाजीनगरसह 29 महापालिकांतील प्रवर्ग निश्चित

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर? छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग […]

अधिक वाचा..