‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ची घोषणा. नागपूर: राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असून कर्जमाफीचा गाजावाजा करताना दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकरी वंचित […]

अधिक वाचा..

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित […]

अधिक वाचा..

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा आरोप मुंबई: उच्च शिक्षणातील ६५९ पदांच्या भरतीची घोषणा करून राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. २०२२ पासून सरकार सातत्याने भरतीच्या घोषणा करत असले […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, ड्रग पेरण्याची धमकी; सरकारवर विजय वडेट्टीवारांचा घणाघात

पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरले; लोकशाही दडपण्याचा आरोप नागपूर: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असून त्यांना ड्रग पेरण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी सरकार त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]

अधिक वाचा..

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा […]

अधिक वाचा..

बुडाला जळतंय, डोंगराची आग विझवायला पळतंय; उद्धव ठाकरेंवर शिंदेंचा घणाघात

सोनम वांगचूक आंदोलनाच्या समर्थनावरून टीका; हिंदुत्व, मोदी सरकार, एनडीए, पेपर लीक आणि विरोधकांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंची जोरदार टीका मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. “बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय,” अशी बोचरी टीका करत त्यांनी उद्धव […]

अधिक वाचा..

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त किंवा विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली. तसेच एसआयटी चौकशी ही केवळ धुळफेक असल्याचा आरोप करत चंपत राय आणि अनिल मिश्र यांच्यावर […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडल्याचा दावा केला जात असला, तरी गेल्या १२ वर्षांत देशासाठी त्यांच्या सरकारने नेमके काय योगदान दिले, हा संशोधनाचा विषय असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. “मोदी सरकारमध्ये ‘राम’ही नाही आणि दाखवण्यासारखे ‘काम’ही […]

अधिक वाचा..

‘अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: Sanjay Raut यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare आणि Dhananjay Munde यांच्यावर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भूमिका […]

अधिक वाचा..