विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरु होणार

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर […]

अधिक वाचा..

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश

शिक्रापूर (शेरखान शेख): धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तीन शाळांची निवड करण्यात आली असून पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण पुणेच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे. समाजातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये व उच्च शिक्षणाच्या बदलत्या […]

अधिक वाचा..

खासगी शाळांमधील शुल्क ठरविण्यासंदर्भात तज्ज्ञांची समिती नियुक्त करणार

मुंबई: विना अनुदानित शाळांचे शुल्क साधारणपणे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सोयीसुविधांवर अवलंबून असते. शाळांमधील शैक्षणिक शुल्क वाढविताना संबंधित शाळेच्या पालक शिक्षक संघटनेबरोबरच चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येतो. मात्र, राज्य शासनाचे नियंत्रण रहावे तसेच या शाळांमधील शुल्क नेमकी किती असावे याबाबत एक तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य […]

अधिक वाचा..

शाळांना यंदा ४१ दिवसांची उन्हाळा सुटी! उन्हामुळे आजपासून शाळांची वेळ बदलणार…

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात (साडेसात ते साडेअकरा) भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो. आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी

स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वामी विवेकानंद फाउंडेशन व श्रीपाद मेडिकल हे नेहमीच वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम राबवत असताना त्यांच्या वतीने नुकतेच परिसरातील सात शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर विद्यालयास स्वामी विवेकानंद […]

अधिक वाचा..

या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करणार

मुंबई: भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण तसेच […]

अधिक वाचा..

आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला

स्वराज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश २१६ कोटी अनुदान उपलब्ध शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ३२४ कोटी रुपयांपैकी डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ महिन्यातील वेतनासाठी २१६ कोटी रुपये इतके वेतन अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले असल्यामुळे आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर […]

अधिक वाचा..

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय […]

अधिक वाचा..

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे!

नागपूर: युपीए सरकारने सर्वांच्या शिक्षणाची व्यवस्था लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायदा केला आहे. या कायद्यानुसार ६ वर्षांपासून १४ वर्षांपर्यतच्या मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्यघटनेत बदल करून तो हक्क दिला आहे, तो बदलण्याचा आपल्याला अधिकार नाही. एकही मुलही शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही सरकारची जबाबदारी आहे. एका मुलासाठीही शाळा, शिक्षण, मध्यान्ह […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, […]

अधिक वाचा..