मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर […]

अधिक वाचा..

कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

मुंबई: ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे, फडणवीस आणि शिंदेंना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे असा टोलाही जयंत पाटील […]

अधिक वाचा..

ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

मुंबई: विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार केली. विधानसभेचे कामकाज खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून बुधवारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले होते. आज सभागृह सुरू होताच […]

अधिक वाचा..

गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी… मुंबई: होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणूकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले… पुण्यात नाही चालले खोके उदास झाले बोके…या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण […]

अधिक वाचा..

सिडको-हडकोत आजपासून महापालिका दोन टप्प्यात काढणार अतिक्रमणे…

औरंगाबाद: छ. संभाजीनगरातील सिडको-हडको भागातील अतिक्रमणे आज म्हणजे २ मार्चपासून काढण्यात येणार असून महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागासोबत विद्युत विभागाचे पथकही राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्ते, फुटपाथ, ग्रीन बेल्टवरील अतिक्रमणे काढण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ओपन स्पेस, नागरिकांच्या सोयीसुविधांच्या जागांवरील अतिक्रमणे काढली जातील. सिडको-हडकोतील अतिक्रमणांच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने यापूर्वीच अतिक्रमणे […]

अधिक वाचा..

वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज…

औरंगाबाद: वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरतीची नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून या संदर्भात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. यात तरुण आणि तरुणीही अर्ज करु शकतात. देशभरात अग्निवीरच्या माध्यमातून नौदलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आता वायुदलातही भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वायुसानेसाठी लेखी परीक्षा २० […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन सुमारे 25 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची चोरी 

शिरुर: शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील जांभळी मळा येथुन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान गट क्रमांक 1133 मधील 10 चंदनाच्या झाडांची चोरी झाली असुन त्यांची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आहे. याबाबत संतोष बबनराव मोरे (वय 44 वर्षे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शिरुर तालुक्यातील दहा वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

शिरुर: पुणे -सातारा महामार्गावर बुधवारी मध्यरात्री झालेला अपघात दोघांसाठी जीवघेणा, तर 5 जणांच्या कुटुंबांसाठी खर्चिक ठरला. ट्रक व कारच्या धडकेत शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे या मायलेकांना आपला जीव गमवावा लागला. पारगाव येथे महामार्गावर ही घटना घडली. खंडाळा येथील एका दवाखान्यात या अपघातातील 5 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले […]

अधिक वाचा..

देशाच्या विकासात कामगार व शेतकऱ्यांचे सर्वात मोठे योगदान…

काँग्रेसकडून कामगार हिताचे रक्षण पण कामगारांना उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव मुंबई: कामगार व शेतकरी ही मोठी शक्ती असून काँग्रेस सरकारने त्यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारपर्यंत काँग्रेसने कामगार हिताचे विविध कायदे केले व त्यांना त्यांचे हक्क दिले. कामगार व शेतकरी या दोन घटकांचे देशाच्या विकासात सर्वात मोठे […]

अधिक वाचा..

गालिबच्या शायरीतून महेश तपासे यांचा मोदींवर निशाणा…

मुंबई: “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी तर […]

अधिक वाचा..