ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खेडमधील प्रचारसभेत विकास कामांसह योजनांचाही वाचला पाढा राजगुरुनगर: ग्रामीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणे गरजेचे असून शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची खेड-राजगुरुनगर येथे जाहीर प्रचारसभा पार पडली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यकर्तेच खासदार-आमदार घडवतात, ही कार्यकर्त्यांची […]

अधिक वाचा..

ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राज्य ग्रंथालय परिषदेची पहिली बैठक संपन्न  मुंबई-६ :- राज्य शासनाच्या निर्णयानुसार सुमारे १६ ते १७ वर्षांनंतर राज्य ग्रंथालय परिषद पुन्हा गठीत करण्यात आली आहे. नव्याने गठीत परिषदेची पहिली बैठक आज संपन्न झाली असून ग्रंथालय चळवळीला नवे बळ देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार,असे प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मंत्रालयात राज्य ग्रंथालय परिषदेची […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..

काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंब्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या खासदारांना पत्र पाठवणार; न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी

उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डींनी घेतली काँग्रेस खासदारांची भेट मुंबई: उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद सअत्यंत महत्वाचे असून विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार […]

अधिक वाचा..

अखेरच्या क्षणापर्यंत सुटली नाही साथ; पतीच्या निधनानंतर अवघ्या 20 मिनिटात पत्नीनेही सोडले प्राण

वहागाव: पती- पत्नीचे नाते हे अतूट आणि एकमेकांचे आयुष्य व्यापून टाकणारे असते. चुकूनही मी तुझा हात सोडणार नाही, असे वचन एकमेकांना देत ते निभवण्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात; पण मृत्यूनंतरही एकमेकांची साथ सोडत नाहीत, अशा काही अपवादात्मक घटना कुठेतरी घडल्याचे कानावर पडते. तळबीडलाही (गुरुवार) अशीच घटना घडली. आयुष्यभर साथ देणाऱ्या पतीच्या निधनानंतर अवघ्या २० मिनिटांतच पत्नीनेही […]

अधिक वाचा..

पालकमंत्र्यांची साथ अन्‌ मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला ‘हा’ निर्णय

सोलापूर: सोलापूर- मुंबई विमानसेवेतील प्रमुख अडचण राज्य सरकारने दूर केली आहे. विमानसेवा सुरू झाल्यानंतर व्यावहारिक तूट निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) देण्यास आज (सोमवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकी मंजुरी देण्यात आली. यामुळे आता सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोलापुरात रोजगार येण्याकरिता शहरातून मुंबई, बंगळूर, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विमानसेवा सुरू करण्याची मागणी वारंवार होते. तसेच […]

अधिक वाचा..

आणीबाणीला RSS सरसंघचालक बाळासाहेब देवरसांचे समर्थन, देवरसांची भूमिका भाजपाला मान्य नाही का

इंदिराजींचा आणीबाणीचा निर्णय संविधानिक, पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? मुंबई: देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिनबुडाचे आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

मुंबई: “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..