उबाठा गटात ‘संशय कल्लोळ’चा प्रयोग; खासदारांकडून रोज निष्ठेची परीक्षा; डॉ. ज्योती वाघमारे

मुंबई: शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर जोरदार टीका करत पक्षातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासदारांमधील असंतोष दडपण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उबाठा गटात सध्या ‘संशय कल्लोळ’ नाटकाचा प्रयोग सुरू असल्यासारखी परिस्थिती असून, खासदारांना दररोज निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणाभाका घ्याव्या लागत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

बेट भागात जागरण गोंधळाच्या नावाखाली उडणार राजकीय धांदल?

निवडणुकीआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बाजूला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला जागरण–गोंधळ आणि […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; आठ मंत्र्यांच्या विकेट पडणार 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकरच आपले मंत्रिपद गमवावे लागू शकते. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही मंत्री आधीच विविध वादांमुळे अडचणीत सापडले आहेत, तर काहींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याऐवजी […]

अधिक वाचा..

शांत झोप लागत नाही, जीव तगमग करतो? १ खास उपाय- झोप न येण्याचा प्रश्नच सुटेल.

कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते. नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. […]

अधिक वाचा..