भारतीय संगीतविश्वातील जादुई आवाज हरपला

मुंबई: भारतीय संगीत क्षेत्राला अजरामर करणाऱ्या स्वरसम्राज्ञी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात मंत्री भोंसले म्हणाले की, आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि जादुई गायनशैलीने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. विविध भाषांमधील हजारो गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध […]

अधिक वाचा..

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत; जयकुमार रावल

मुंबई: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या […]

अधिक वाचा..

देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत: राज्यव्यापी विश्वविक्रम

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत सादर केली. या उपक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर सात लाख शिक्षकांनीही मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या माहितीप्रमाणे, या उपक्रमाची अधिकृत नोंद World Book of Records, London या आंतरराष्ट्रीय संस्थेत झाली असून यामुळे विश्वविक्रम […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम

मुंबई: भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगमान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, एज्युकेशन या इंग्लंड […]

अधिक वाचा..

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान…

जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया… मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा […]

अधिक वाचा..

विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हावे 

मुंबई: देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकीय ज्ञान न देता प्रात्यक्षिकवर आधारित ज्ञान देणे गरजेचे आहे. ज्या देशामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देत संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यानुसार देशातील प्रत्येक विद्यापीठांमधून जगाच्या कल्याणासाठी उपयोगी असलेले संशोधन व्हायला पाहिजे, […]

अधिक वाचा..

धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा; डीजिटल युगात संवाद महत्त्वाचा

मुंबई: धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व […]

अधिक वाचा..

जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत

मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत धू धू धुतले. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची लोककलेने रंगतदार सुरुवात

मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव […]

अधिक वाचा..