शिक्रापूर : खेळता असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षांच्या चिमुकल्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घराच्या पत्र्यावर गेलेला चेंडू काढणे हर्षल पिंगळे (वय १२) या चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. पत्र्यावर गेलेला चेंडू काढताना त्याला विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पिंगळे या बारा वर्षीय मुलाचा खेळत असताना चेंडू घरावरील पत्र्यावर गेला होता. तो काढण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास हर्षल हा घरावरील पत्र्यावर चढला. चेंडू घेऊन खाली उतरत असताना घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला.
दरम्यान, पांडुरंग ढोले यांनी लाकडी काठीने हर्षल याला बाजूला करत जवळील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी हर्षल पिंगळे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राकेश मळेकर करत आहेत.
कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या
शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…
शिरूर! काही मिनिटातच फोर व्हीलर गाड्या लंपास करणारा कुख्यात चोरटा गजाआड…
माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…