मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे.
आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य कुटुंबांचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यातच बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि या भयावह महागाई समोर लाडकी बहिण योजना काहीच नाही, वाढती बेरोजगारी आणि महागाई या योजनेच्या कोणत्याही सकारात्मक परिणामाला शून्य ठरवते.
काँग्रेसच्या या जाहिरातीतून ठाम आणि स्पष्ट संदेश आहे: महाराष्ट्र महायुतीच्या धोरणांपेक्षा चांगल्या धोरणास पात्र आहे, जी धोरणे महागाई आणि बेरोजगारी वाढवण्यास कारणीभूत ठरली आहेत आणि कोणत्याही शेवटच्या क्षणी आणलेल्या योजनांनी त्यांच्या घसरत चाललेल्या प्रतिमेला वाचवता येणार नाही.