अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून त्यांच्या जयंतीनिमित्त कोणताही विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नसल्याने साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे […]

अधिक वाचा..

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून कौतुक पुणे: लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी राज्य शासनाने ‘विनोबा’ या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील […]

अधिक वाचा..
ramdas-thite

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बौद्धिक क्षमतेइतकेच शारीरिक सदृढतेलाही महत्त्व आहे. ध्येयपूर्तीसाठी सातत्य, समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न या मूल्यांची जोड आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शिक्रापूर शाखेच्या […]

अधिक वाचा..

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य 

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना सहन करावा लागत आहे. परिसरातील मुख्य ड्रेनेज लाईन गेल्या आठ दिवसांपासून खराब झाल्याने अनेक सोसायट्यांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. रस्त्यांवरुन वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, ठिकठिकाणी निर्माण झालेली डबकी आणि कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती […]

अधिक वाचा..

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई येथील युवा उद्योजक व समाजसेवक अमोल रामदास पुंडे यांनी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास सुलभ होणार असून परिसरात त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

अधिक वाचा..

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून ‘मंडल यात्रा’ची घोषणा. नागपूर: राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असून कर्जमाफीचा गाजावाजा करताना दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेलाच कात्री लावत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून आधीच लाखो शेतकरी वंचित […]

अधिक वाचा..

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे नाट्यगृह अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि सामाजिक वारशाचा प्रसार करणारे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले की, चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक […]

अधिक वाचा..

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह केवळ सांस्कृतिक वास्तू नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा करणारे […]

अधिक वाचा..

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोचालकाचा टेम्पो आणि रॅम्पच्या दरम्यान अपघात झाल्याने चेंगरुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि १९) जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर मृत चालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र, कामगार नेते नानासाहेब लांडे यांनी कंपनी प्रशासनासोबत केलेल्या पाठपुराव्यामुळे मृत चालकाच्या […]

अधिक वाचा..