संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला; दामिनी पथकाची तात्काळ कारवाई, मुलीला मिळाले नवजीवन

छत्रपती संभाजीनगर : “काही बोलावं, कसं सांगावं?” असा प्रश्न निर्माण करणारी घटना आज बीड बायपास रोड परिसरात उघडकीस आली. एका १७ वर्ष ६ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असताना पोलिसांनी वेळीच धाड टाकून हा बालविवाह रोखला. दामिनी पथक आणि महिला व बालविकास समितीच्या तत्परतेमुळे एका मुलीचं आयुष्य अंधारातून वाचलं आहे. नेमकं प्रकरण काय? बीड बायपास […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या शैलीतच सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा; गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही

पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. गुरुवारी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रथमच उपस्थिती लावली. या बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचीच झलक दाखवत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची सद्यस्थिती, […]

अधिक वाचा..

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती होणार आई; जूनमध्ये बाळाच्या आगमनाची गोड बातमी

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूडसह मराठी आणि हिंदी कलाविश्वात अनेक कलाकारांकडून गुडन्यूज समोर येत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन विश्वातूनही एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती हिने चाहत्यांसोबत आई होणार असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी सुरभीने तिच्या गरोदरपणाची घोषणा सोशल मीडियावर केली. ११ फेब्रुवारी रोजी तिने […]

अधिक वाचा..

विशाल निकम-अक्षया हिंदळकर विवाहबद्ध; त्रियुगीनारायण मंदिरात पार पडला डेस्टिनेशन वेडिंग सोहळा

मुंबई: गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली असून आता ‘येडं लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता विशाल निकमही विवाहबंधनात अडकला आहे. १० फेब्रुवारी रोजी विशालने अभिनेत्री अक्षया हिंदळकरसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. दोघांची ओळख ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकेतून झाली. त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये विशालने अक्षयाचा अनेकदा “माझी सौंदर्या” असा उल्लेख केला होता. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी’मध्ये राखीचा पुन्हा धडाका! रुचिता-रोशनसोबत जोरदार वाद, घरात रंगणार हायव्होल्टेज ड्रामा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून खेळाने वेगळीच दिशा घेतली आहे. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरण अधिकच तापले असून सध्या सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान वादांचे सत्र रंगताना दिसत आहे. टास्क संपल्यानंतर राखी सावंत पुन्हा एकदा स्पर्धकांना आरसा दाखवण्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्वप्रथम कपडे धुण्याच्या कारणावरून राखी आणि रुचिता यांच्यात खडाजंगी होणार आहे. “माझ्याशी […]

अधिक वाचा..

‘ठरलं तर मग’मध्ये व्हॅलेंटाईन स्पेशल! सायलीचं अर्जुनला भन्नाट सरप्राईज

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांच्या कामाची अदलाबदल केल्याने कथेला वेगळीच रंगत आली आहे. अर्जुन घराची जबाबदारी सांभाळताना दिसतोय, तर सायली ऑफिसमध्ये जाऊन काम करत आहे. या बदलामुळे दोघांच्या नात्यात हलकेफुलके, मजेशीर प्रसंग घडताना दिसत आहेत. सायली आता अगदी अर्जुनसारखी वागताना दिसतेय. […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण; सुनेत्रा पवार मात्र विकास बैठकीत व्यस्त

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला असताना पक्षांतर्गत राजकारण तापलेले दिसत आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली. शरद पवार गटातील काही नेत्यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिल्याने या विषयावर अधिकच खळबळ उडाली आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मौन बाळगल्याचे दिसून […]

अधिक वाचा..

हाडे आणि सांधे दुखी साठी सोपा उपाय चणे आणि गूळ 

“हाडं कमकुवत? सांधे दुखतायत? केस गळतायत?” कदाचित तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे… पण चिंता करू नका, घरच्या घरी सहज मिळणाऱ्या दोनच गोष्टींनी ही कमतरता भरून काढता येते. दररोज सकाळी उपाशीपोटी एक वाटी चणे आणि थोडासा गूळ खाल्ला, की शरीरात नैसर्गिकरित्या कॅल्शियमचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. ही एक साधी आणि आयुर्वेदिक पद्धत असून, कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय […]

अधिक वाचा..

आपल्याला पाच बोटे का असतात

खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बाटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही […]

अधिक वाचा..