मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम […]

अधिक वाचा..

खेड पंचायत समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; १६ पैकी १२ जागांवर दणदणीत विजय

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल स्पष्ट झाले असून राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटानेही लक्षणीय कामगिरी केली आहे. मात्र या सर्व निकालांमध्ये पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकाल राज्यभरात चर्चेचा […]

अधिक वाचा..

सलमान खान भारतीय नागरिक, आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तर त्यात गैर काय..

मुंबई: सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राज्यात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले परखड मत व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संस्था असून गेल्या शंभर वर्षांपासून देशात कार्यरत आहे. आपत्ती आली त्या ठिकाणी संघ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा; चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचे आवाहन मुंबई: केंद्र शासनाने “राष्ट्रीय क्वांटम मिशन (National Quantum Mission – NQM)” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा मुख्य उद्देश आहे. […]

अधिक वाचा..

लोकसेवा आयोगातून आमदाबादच्या श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्रद्धा या शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहान वयातच पितृछत्र […]

अधिक वाचा..

एसटीच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ बसची भर

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) बस बांधणीत नवे प्रयोग करत आपल्या ताफ्यात आधुनिक बस दाखल करण्यास सुरुवात केली असून त्याचा थेट फायदा महामंडळासह प्रवाशांनाही होऊ लागला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात असलेली ५५ आसनी बस आता नव्या अत्याधुनिक स्वरूपात पुन्हा एकदा सेवेत येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने ३ बाय […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुकाच नव्हे तर संपुर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘कमळ’ वादळासारखे फुलले, तर वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळाची टिकटिक मतदारांनी थेट बंद केली आहे’. हा निकाल म्हणजे केवळ पराभव नाही, तर राष्ट्रवादीच्या अहंकाराला बसलेली जबरदस्त चपराक असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या गटात राष्ट्रवादीची मक्तेदारी […]

अधिक वाचा..

क्रियेटीनीन लेव्हल योग्य स्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना

१) मक्याच्या केसांना रोज उकळून ते पाणी कपभर प्या. २) कोथिंबीर रस घ्या. ३) कोबीचा रस घ्या. ४) दालचिनी पावडरचा काढा एक चमचा मध घालून घेणे. ५) प्लंबम ३०या होमिओपॅथी च्या चार चार गोळ्या रोज सकाळी घेणे. ६) पाणी भरपूर पिणे, (३ ते ४ लिटर) ७) हलका व्यायाम करणे. ८) मासाहार टाळावा. ९) केमोमाईनच्या पानांचा […]

अधिक वाचा..

भाषाविषयात हिंदुत्व आणू नका; मराठी भाषा-माणूसच आमचं सर्वोच्च प्राधान्य; राज ठाकरे

मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत […]

अधिक वाचा..

आजपासून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे सुनेत्रा अजितदादा पवारांच्या हाती; दादांच्या प्रतिमेसमोर भावूक क्षण

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत नतमस्तक झाल्या. सिध्दीविनायक मंदिर आणि चैत्यभूमी येथील दर्शनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश […]

अधिक वाचा..