चाकण MIDCला मोठा धक्का? 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत

चाकण : मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या चाकण MIDCसमोर आता पायाभूत सुविधांचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. खराब रस्ते, खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात तसेच पाणी आणि वीजपुरवठ्याच्या तक्रारींमुळे चाकणमधील सुमारे 20 लघुउद्योगांनी स्थलांतराची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCमध्ये […]

अधिक वाचा..

शरद पवारांच्या एनर्जीचा आदर्श घ्या’; मोदींच्या कौतुकाचा अमोल कोल्हेंनी सांगितला किस्सा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत १५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा केली. या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीतील […]

अधिक वाचा..

भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; भाजप नेते विजय मिश्रा यांचा जागीच मृत्यू

अयोध्या : अयोध्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि परसवा गावचे रहिवासी विजय मिश्रा यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. शनिवारी (8 ऑगस्ट) रात्री मिल्कीपूर बाजारातून आपल्या गावाकडे दुचाकीवरून परतत असताना भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू […]

अधिक वाचा..

ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?

मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]

अधिक वाचा..

इथेनॉल मिश्रणावरून भाजप खासदारांची जीभ घसरली; म्हणाले…

मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका केली. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. […]

अधिक वाचा..

शिवसेना खासदारांच्या विलिनीकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; ठाकरे गटाला स्थगितीची अपेक्षा, शिंदे गटाचे काय होणार?

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेला ठाकरे गटाने दिलेले आव्हान न्यायालयासमोर आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. […]

अधिक वाचा..

पुण्याच्या वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा ‘बायपास’! ५२ हजार कोटींचा रिंग रोड वेगाने मार्गी

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. तब्बल ५२ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातून जाणाऱ्या अवजड आणि मालवाहतूक वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर आणि अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

मोदींची सुप्रिया सुळेंसह ८ खासदारांची बैठक; पवार गटाच्या NDA प्रवेशाची कुजबुज; बैठकीत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. पंतप्रधान […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजपची भव्य तिरंगा रॅली; १५ ते २० हजार दुचाकींचा सहभाग? राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर म्हणाले…

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून […]

अधिक वाचा..

‘सिंदूर महारक्तदान’ला दिल्लीतील जवानांसाठी शिवसैनिकांचा सलाम; ८०० जणांचे रक्तदान

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ ही देशसेवा, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत प्रवास करून सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि शिवसैनिकांचे त्यांनी कौतुक केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने […]

अधिक वाचा..