विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक मुंबई: राज्यातील ग्रामीण, आदिवासी, डोंगरी, दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागांतील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अधिकारक्षेत्रातील सर्व विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करून […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, करडे गावातील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अवघ्या ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्यानंतर शिरुर पोलिसांनी वेगळाच पॅटर्न राबविला. शिरुर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत आरोपींची शिरुर शहर आणि करडे गावातुन धिंड काढली. यावेळी पोलिसांच्या कारवाईची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, ‘कायद्यात राहाल […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही. आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी […]

अधिक वाचा..

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई: आरक्षण व्यवस्था ही भारतीय संविधानाने सामाजिक न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समाजघटकांना शिक्षण व रोजगारामध्ये प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने निर्माण केली आहे. मात्र बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत आरक्षण व्यवस्थेचा विविध घटकांवर होणारा परिणाम वस्तुनिष्ठपणे तपासून […]

अधिक वाचा..

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल जिते): मलठण–शिक्रापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे हा मार्ग अक्षरशः धोकादायक बनला असून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. […]

अधिक वाचा..

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत […]

अधिक वाचा..
karade-firing-case

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरुर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ७२ तासांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. सुपा (ता. पारनेर) बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत शिरुर पोलिसांच्या डीबी पथकाने दमदार कामगिरी […]

अधिक वाचा..

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा अॅनिमियासाठी उपयुक्त. हाडे मजबूत करते. यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. संधिवात किंवा ऑस्टिओपोरोसिस असणाऱ्यांसाठी फायदेशीर. पचन सुधारते. अळीवमध्ये फायबर्स (तंतू) भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठता (कब्ज) कमी होते. पचनसंस्थेला चालना देते. प्रजनन स्वास्थ्यात उपयोगी अळीव […]

अधिक वाचा..

केस गळतीवर घरगुती उपाय 

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे […]

अधिक वाचा..