करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभे असलेले महावितरणचे विजेचे खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा अधिक प्रमाणात जाहिरातबाजीसाठी वापरले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यालगतच्या अनेक खांबांवर CCTV कॅमेरे, प्लॉटिंग प्रकल्प, जमीन खरेदी-विक्री तसेच विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचा सर्रास गैरवापर होत असून संबंधित विभाग मात्र याकडे कानाडोळा करत […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा गटातील खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी सर्व आवश्यक संसदीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण […]

अधिक वाचा..

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडून आलेल्या काही खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने […]

अधिक वाचा..
aamdabad-tree

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा उपक्रम राबवत आमदाबाद येथील युवा वकील अॅड. ऋतिक भास्कर थोरात यांनी आपल्या 27व्या वाढदिवसानिमित्त गावात 27 वृक्षांची लागवड केली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे गावकऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. आमदाबाद गावातील मुख्य रस्त्यालगत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा […]

अधिक वाचा..

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जून होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद तसेच विविध प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री […]

अधिक वाचा..

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे कारण असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत केला. तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत […]

अधिक वाचा..
pargaon-police

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन सराईत चोरांना पारगाव (कारखाना) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व एक पल्सर गाडी जप्त केली आहे. या सराईत चोरांनी आठ गुन्हेगारी कृत्याची कबुली दिली आहे. खडकवाडी येथील सिंधुबाई बाळू घाडगे (रा. गाडकवाडी तालुका […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारांनी दमदार कामगिरी नोंदवली. विजयी उमेदवारांची यादी छत्रपती संभाजीनगर – जालना : सुहास शिरसाट (भाजप) ठाणे : […]

अधिक वाचा..

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्रीद्वयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी […]

अधिक वाचा..

शिंदेंचा ‘षटकार’; ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेनेत दाखल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी मोठी घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे […]

अधिक वाचा..