रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयसीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीतील गणेगाव खालसा, ता. शिरुर, जि.पुणे येथे दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे (रा. दडपिंपरी,ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७) हिचा नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा […]

अधिक वाचा..

शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला…शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून

शिरुर (अरुणकुमार मोटे) बीडच्या मस्साजोग नंतर शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर निर्घुण खून झाला असून यात एका तरुणाचे शीर धडा वेगळे ,दोन हात ,एक पाय तोडला असुन एक पाय अर्धवट तोडलेला मृतदेह आळढून आल्याने शिरुरसह श्रींगोदा तालुक्यातही मोठी खळबळ उडाली आहे.   याबाबत खात्रीलायक सुत्रांच्या माहितीनुसार शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) या […]

अधिक वाचा..

शिरुर ‘बालमित्र ग्राम’ अभियान करुणामय समाजाची नांदी ठरेल; सुमेधा कैलाश

शिरुर (तेजस फडके) समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपण समाजातील पिडीत लोकांना दया आणि करुणा दाखवली. तर बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि सामाजिक दुष्कृत्ये दुर होतील. तसेच प्रकारच्या समस्यांचे निराकरण आणि समाधान शक्य असल्याचे प्रतिपादन सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनच्या सहसंस्थापक सुमेधा कैलाश यांनी केले.   रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० […]

अधिक वाचा..

रोहयो मजूरांची होळी आनंददायी होण्याचा मार्ग खुला

मुंबई: पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेऊन संबंधीत मजूरांना त्यांची 45 कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेने […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांनी दारुसाठा कारवाई नंतर गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या…

साडेतीन किलो गांजा जप्त.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिसांनी दारूसाठ्याच्या कारवाईनंतर जांबुत येथून गांजा विक्री करणाऱ्या एका जणाला पकडले असून त्याच्याकडून साडेतीन किलो गांजा किंमत ३८ हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे. समिर हजरतअली शेख (वय ३० रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे) […]

अधिक वाचा..

टेंपो व मोटार सायकलच्या धडकेत १ जण मृत्युमुखी, तर २ जण जखमी

शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे): शिरसगाव काटा, (ता. शिरूर) येथे मोटार सायकलला टेंम्पोने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत. करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९ वर्ष ) रा. जरखडीया, जहूर, चितवल, बडवाणी जि. राजपुर, राज्य मध्य प्रदेश असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव असून टिकम जमरे व गेंदालाल जमरे हे दोघे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना, शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी […]

अधिक वाचा..

राज्यात धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव

मुंबई: महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा […]

अधिक वाचा..

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करावे

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आरोग्य तपासणीपासून एकही […]

अधिक वाचा..