ranjangaon-midc-police station

शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…

शिरूर (तेजस फडके) : पुण्यातील चऱ्होली भागात १३ मे रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. अष्टविनायक रोड, पिंपरी दुमाला, वाघाळे आणि सोनेसांगवी परिसरात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील महिलेला चोराचा चेहरा पाहून बसला धक्का; लाखोंचे दागिने हस्तगत…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील चांडोह येथे एका महिलेनं चोरांच्या भीतीनं आपले दागिने किचनमध्ये ठेवले होते. मात्र, डब्यात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने गायब झाल्याने महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. पण, शिरूर पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या चोरीचा छडा लावला. मात्र जेव्हा खरा चोर समोर आला, तेव्हा स्वतःच्या मुलाला पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी मुलाला […]

अधिक वाचा..

‘कटू औषध’ पण काळाची गरज; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

नेतृत्वालाही आदर्श घालण्याचे आवाहन मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई, महागाई आणि परकीय चलन तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ऊर्जा बचत व खर्च नियंत्रणाच्या निर्णयांचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले परिपत्रक हे केवळ प्रशासकीय आदेश नसून भविष्यातील संभाव्य आर्थिक संकटाची चाहूल ओळखून […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय नेमबाजीत शिरूरच्या समृद्धीची सुवर्णझेप

६१२.४ गुणांसह आंतरराष्ट्रीय निवड चाचणीत प्रवेश शिरूर (अरुणकुमार मोटे): २७ व्या ऑल इंडिया कुमार सुरेंद्र सिंग राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या कु. समृद्धी अजय चव्हाण हिने नेत्रदीपक कामगिरी करत संपूर्ण तालुक्याचा अभिमान उंचावला आहे. देशभरातील अव्वल नेमबाजांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात समृद्धीने तब्बल ६१२.४ […]

अधिक वाचा..

चक्कर येण्याची कारणे व घरगुती उपाय 

साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे – थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी

पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता: 1) आरोग्याची काळजी पाण्याचे सेवन पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका. आहार ताजे […]

अधिक वाचा..

लहानग्या विराटला ‘शिंदे काकां’चा दिलासा; विनामूल्य शस्त्रक्रियेमुळे पुन्हा खुलले हास्य

ठाणे : सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावातील ८ वर्षीय विराट भोसलेच्या मदतीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde धावून आले आहेत. जन्मतः नाक आणि घशात गाठ असलेल्या विराटवर ठाण्यात विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर त्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुनावळे गावातील विराटच्या नाकात आणि घशात जन्मापासूनच गाठ होती. वय वाढत गेले तसे या गाठींचा आकारही वाढत गेला. […]

अधिक वाचा..

डॉलरला राष्ट्रवाद कळत नाही; बाजाराला फक्त गणित समजते!

मुंबई: भारतीय शेअर बाजारातून गेल्या दोन महिन्यांत तब्बल 21 अब्ज डॉलरची परदेशी गुंतवणूक बाहेर गेल्याने अर्थव्यवस्था आणि बाजारातील स्थैर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेतील वाढते व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि भारतीय बाजारातील उच्च मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून माघार घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मोठ्या प्रमाणात विक्री […]

अधिक वाचा..

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर आर्थिक आणि संसाधनांच्या टंचाईची शक्यता निर्माण झाली असताना, महाराष्ट्र शासनाने राज्यभरात संसाधन बचत आणि आर्थिक शिस्तीवर भर देणारे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक जारी केले आहे. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या या परिपत्रकात इंधन बचत, ऊर्जा संवर्धन, डिजिटल प्रशासन, नैसर्गिक शेती आणि सार्वजनिक वाहतूक वापर […]

अधिक वाचा..

शहरी कामगारांच्या हक्कांसाठी युवक काँग्रेसचा एल्गार; शहरी कामगार न्याय अभियान सुरू

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचे त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेस कार्यालयात […]

अधिक वाचा..