जळोची रस्त्यावर २.३५ कोटींचा गांजा जप्त; होळीआधी बारामतीत मोठी कारवाई

बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य […]

अधिक वाचा..

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस […]

अधिक वाचा..

मुलुंडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मुंबई: सालाबादप्रमाणे यावर्षीही मुलुंड विभागात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून केली. यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन करत उपस्थितांना साहित्यविश्वातील काही रोचक क्षणांची सफर घडवली. दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ मध्ये […]

अधिक वाचा..

संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी ‘मूळ पादुका’ मागणीवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबई: संत परंपरेने समृद्ध महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या ‘मूळ पादुका’ नेण्याच्या मागणीवर विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सविस्तर चर्चा झाली.सभागृहात विविध सदस्यांनी आपापली मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे : कात्रज परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून […]

अधिक वाचा..

दादांच्या जाण्याने आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

एक महिना पूर्ण: अजित पवारांच्या आठवणीत युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती. आजही त्यांच्या आठवणीने कुटुंबीय आणि समर्थक भावूक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट […]

अधिक वाचा..

एसटी च्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही […]

अधिक वाचा..

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..