फाशीच्या शिक्षेला पर्याय! गळफास पद्धतीविरोधातील जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली: भारतामध्ये अत्यंत क्रूर गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गळफास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही पद्धत अतिशय वेदनादायी आणि अमानुष असल्याचा युक्तिवाद करत, त्याऐवजी अधिक मानवी आणि कमी वेदनादायी पर्यायांचा विचार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर अलिकडेच न्या. विक्रम नाथ […]

अधिक वाचा..

11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अक्षरोत्सव प्रदर्शन

रिंगणे येथे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला आयोजन सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव या आगळ्यावेगळ्या संग्रहाचे प्रदर्शन रिंगणे येथे होणाऱ्या 11 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस वाचकांना पहायला मिळणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, […]

अधिक वाचा..

स्थानिक मागण्या मान्य! पालघर जिल्हाधिकारी कार्यालय घेराव स्थगित

राज्यस्तरीय मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार पालघर: ठाणे–पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि कोळी बांधवांच्या विविध ज्वलंत मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या जोरदार लॉंग मार्चनंतर महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. स्थानिक पातळीवरील प्रमुख मागण्या मान्य झाल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्तावित घेराव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारशी […]

अधिक वाचा..

मानधन योजना अडचणीत! सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे लोककलावंत हैराण

मुंबई: राज्यातील राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य खात्याच्या ढिसाळ आणि असंवेदनशील कारभारामुळे गंभीर अडचणीत सापडली आहे. अनेक जिल्ह्यांत अद्याप मानधन निवड समित्याच गठीत झालेल्या नसून, सन २०२३ पासूनचे ऑफलाईन (प्रत्यक्ष) अर्ज धूळखात पडून असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. त्यामुळे हजारो लोककलावंतांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असून राज्यभर […]

अधिक वाचा..

विरोधासाठी विरोध नको! ‘दावोस’कडे राजकारणापेक्षा महाराष्ट्र हिताने पाहण्याची गरज

मुंबई (शितल करदेकर): महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ‘दावोस’ हा केवळ परदेश दौरा नसून एक महत्त्वाचे जागतिक व्यासपीठ आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या दौऱ्यावरून सुरू असलेली राजकीय टीका ही विरोधासाठी विरोध या चौकटीत अडकलेली दिसते. प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहेच, पण महाराष्ट्राची प्रतिमा धूसर होईल असा बोंबाबोंब करणारा विरोध कितपत योग्य आहे, याचे […]

अधिक वाचा..

महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर; छत्रपती संभाजीनगरसह 29 महापालिकांतील प्रवर्ग निश्चित

मुंबई: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर निवडला जाणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक महापालिकांमध्ये महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर? छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग […]

अधिक वाचा..

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते. ध्वजारोहण आणि ध्वज […]

अधिक वाचा..

पॉलिटिकल कनेक्शनमुळे आरोपी मोकाट! सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त म्हणून कायद्याचा धाक संपला का

मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांवर संताप; शिंदे गटाच्या नेत्याच्या कुटुंबाचा अटकपूर्व जामीन फेटाळला पुणे: “सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यामुळे आरोपींना कायद्याची भीती उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड येथील शिवसेना (शिंदे गट) नेते अनिल लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाने अत्यंत […]

अधिक वाचा..

माणुसकीला काळिमा! पतीवरच्या रागातून आईकडून दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या

लातूर: लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे. अश्विनी चौगुले (वय अंदाजे २५) असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या १८ महिन्यांच्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला. […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..