छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थता; मुंबईत उपचारासाठी रवाना

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने Apollo Hospitals येथे नेण्यात आले, जिथे सिटीस्कॅनसह प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. पुढील उपचारांसाठी त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे प्रस्थान केले आहे. या […]

अधिक वाचा..

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच; जयंत पाटील मैदानात, रोहित पाटील यांचा ठाम शब्द

सातारा: साताऱ्यानंतर आता सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) मध्येही सत्तास्थापनेचा पेच कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रोहित पाटील (Rohit […]

अधिक वाचा..

राजकीय उलथापालथ; ठाकरे गटाचे विलीनीकरण, काँग्रेसचे संख्याबळ वाढले

अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत […]

अधिक वाचा..

भिगवण प्रकरणात मोठी घडामोड: तरुण-तरुणी पोलिसात हजर; अपहरण नसून प्रेमप्रकरणाचा दावा

भिगवण: गेल्या दोन दिवसांपासून भिगवण बाजारपेठेतून तरुणीचे अपहरण झाल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणाला आता मोठा ट्विस्ट मिळाला असून संबंधित तरुणी आणि अपहरणाचा आरोप असलेला तरुण दोघेही पोलिसांत हजर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ५० तासांनंतर दोघेही रात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. तरुणीने यापूर्वी व्हिडिओद्वारे मांडलेली भूमिका […]

अधिक वाचा..

हायकोर्टाचा अजब निर्णय! BMCच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड; दोन दिवसांत कपातीचे आदेश

मुंबई : अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यात झालेल्या दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा प्रतिकात्मक दंड ठोठावला आहे.या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव यांना न्यायालयाने दंड केला असून, ही रक्कम त्यांच्या मासिक वेतनातून दोन दिवसांच्या आत कपात […]

अधिक वाचा..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; महादेव मुंडे हत्येतही नाव समोर

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण […]

अधिक वाचा..

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांची जाहीर माफी! पीडित आईचा सवाल; माफीने माझा मुलगा परत येईल का?

नवी दिल्ली: राजधानीतील द्वारका परिसरात भरधाव स्कॉर्पियोच्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देशभरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी जाहीरपणे माफी मागितली असली, तरी पीडित आईने ती ठामपणे नाकारत न्यायाची मागणी केली आहे. “हात जोडून माफी मागतो”; वडिलांचा पश्चात्ताप आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी आपली […]

अधिक वाचा..

सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती महानगरपालिकेत साजरी

मुंबई: मुंबईच्या नागरी आणि प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन Bombay Municipal Corporation चे अध्यक्ष राहिलेले सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांची जयंती आज मुंबई महानगरपालिकेत साजरी करण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात असलेल्या डॉ. भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यास महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या […]

अधिक वाचा..

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे; मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातं; आनंद परांजपे

मुंबई: आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..

देशहित गहाण ठेवून कोणताही व्यापार करार मान्य होऊ शकत नाही

मुंबई: व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, असा गंभीर आरोप करुन […]

अधिक वाचा..