काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

भाजपा उपऱ्यांचा पक्ष; आता रेशिमबाग नाहीतर अदानी अंबानी चालवणार भाजपानी मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा […]

अधिक वाचा..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनेक पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) आणि ब्लॅक पँथर या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या या पक्षाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सर्व सहकारी पक्षांचे आभार मानले. भविष्यातील सर्व निवडणुका […]

अधिक वाचा..

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी  कल्याण डोंबिवली: कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी हे शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे. यामुळे यांच्यासमवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत. […]

अधिक वाचा..

नववर्ष महाराष्ट्रासाठी विकासाच्या नव्या संधी घेऊन येईल; अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा मुंबई: राज्यातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह दूरदर्शी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे ‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र आपली महत्त्वपूर्ण भूमिका यशस्वीपणे बजावेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्ष २०२६ […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसची ३० उमेदवारांची तिसरी व अंतिम यादी जाहीर; राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार निवडणूक रिंगणात

9४ उमेदवारांमध्ये ५२ लाडक्या बहिणी निवडणूक रिंगणात नशीब आजमावणार; लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी… मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज ३० उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये एकूण ९४ जागांवर उमेदवार उभे केले असून पूर्ण ताकदीने व क्षमतेने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार […]

अधिक वाचा..

बोदवड मर्डर केस; खंडणी न मिळाल्याने निर्घृण हत्या! आरोपींचे नाव समोर

औरंगाबाद: बोदवड (ता. सिल्लोड) येथील भुसार मालाचे नामांकित व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण प्रकरणाचा शेवट अतिशय धक्कादायक आणि रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिले होते, याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे सचिन नारायण बनकर – रा. गोळेगाव, ता. सिल्लोड वैभव […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची जी तिसरी यादी जाहीर होईल त्यामध्ये सर्व उमेदवार पूर्ण ताकदीचे व क्षमतेचे असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केला. सोलापूर, रायगड जिल्ह्यातील पनवेल, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूका लढल्या जात आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व […]

अधिक वाचा..

रायगडमधील उबाठा गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी हाती बांधले घड्याळ

रायगडमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का… मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, उपतालुकाप्रमुख गणपत म्हात्रे, नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले आदींसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला महिला बालविकासमंत्री […]

अधिक वाचा..

आपला दवाखाना ठरला मुंबईकर रुग्णांचा आधार

समाजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठिशी, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचा विश्वास मुंबई: मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या […]

अधिक वाचा..

१ कोटीच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. असा घडला थरार शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री […]

अधिक वाचा..