अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांचा शपथविधी म्हणजे भाजपचा मोठा डाव! बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

लातूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते […]

अधिक वाचा..

टायमिंग चुकलं आणि डाव फिरला! शरद पवारांच्या हातातून सत्ता कशी निसटली

मुंबई: राजकारणात वेळेचं महत्त्व असतं आणि तोच वेळ चुकला, तर आखलेले डावही फसतात. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात हेच चित्र पाहायला मिळालं. अजित पवारांच्या पश्चात पक्षाची सूत्रे शरद पवार पुन्हा हातात घेतील, अशी चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्ता समीकरणांनाच कलाटणी दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

पुणे: लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे ग्रामीण पोलिस दलासह वाघोली–लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री सुमारे १० वाजता ड्यूटी पूर्ण करून ते वडगावशेरी येथील निवासस्थानी परतले होते. मध्यरात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने […]

अधिक वाचा..

बदलापूर हादरला! शालेय मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कडक नियमावली जाहीर

बदलापूर: बदलापूर येथे शालेय मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहरातील शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि पालकांसाठी नवीन सुरक्षा नियमावली जाहीर करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच एका […]

अधिक वाचा..

दुःख नाकारलं नाही, जबाबदारी स्वीकारली! सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर अंकिता वालावलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज (३१ जानेवारी) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधीनंतर अभिनेत्री व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..

पवार परिवारात बदलाचा क्षण! अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

मुंबई: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. शपथविधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास या […]

अधिक वाचा..

दुःखाच्या सावटात ऐतिहासिक शपथ! शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, सुनेत्रा पवार यांच्या नावाची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने एकमुखाने त्यांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता राजभवनात शपथविधी पार पडला. मात्र, दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हा शपथविधी अत्यंत साध्या स्वरूपात आणि दुःखाच्या सावटात झाला. […]

अधिक वाचा..

राजकारणात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला; शिवसेना मंत्री संजय शिरसाट

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील राजकारणाला अवघ्या तीन दिवसांतच मोठा वेग आला आहे. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अनपेक्षित आणि वेगवान घडामोडींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या शपथविधीवर भाष्य केले आहे. सामाजिक न्याय […]

अधिक वाचा..

बनावट बियाणे-खत विक्रेत्यांची आता खैर नाही; शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे  छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रस्तावित कायद्यांमध्ये […]

अधिक वाचा..