नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी […]

अधिक वाचा..

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई: राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. ४ ते ६ […]

अधिक वाचा..

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध; डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर: नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवार

यवतमाळ: विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यावर एका मागून एक संकट येत आहे. सोयाबीनच्या पिकाला हमीभाव मिळत नाही तशात येलो मोझॅक या रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक देखील उद्धवस्त झालेलं आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार मदत सरकारने करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बेलोना गावातील शेतात […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

एसटीच्या विकासामध्ये NAREDCO योगदान द्यावे; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन 

मुंबई: एसटी महामंडळाकडे राज्यभरात सध्या ८५० ठिकाणी मिळून एकूण १३ हजार एकर इतकी ” लँड बँक ” उपलब्ध आहे. नुकत्याच झालेल्या शासन निर्णयानुसार एसटीच्या जागेचा सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन (PPP) विकास करण्यासाठी ४९+ ४९ वर्ष अशी एकूण ९८ वर्ष भाडे कराराची मुदत देण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने(NAREDCO) आपल्या अनुभव […]

अधिक वाचा..

सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊया; सुनिल तटकरे

पनवेल, उरण येथील शिवसेना शिंदेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.. मुंबई: एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस एक प्रमुख पक्ष म्हणून काम करत असून जसा सचिन तेंडुलकर मॅचविनर खेळी करायचा तशीच मॅचविनर खेळी करुन भविष्यात आपल्याला जिल्ह्यात पक्षाला बळ देऊया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मुंबईत केले. पनवेल, उरण […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया स्किल्स हब उभारणीमुळे शिक्षण-उद्योग सहकार्यास नवी दिशा मिळणार

मुंबई: राज्यातील औद्योगिक व शैक्षणिक परिसंस्थेला ऑस्ट्रेलियन कौशल्यांशी जोडून परिवर्तनशील शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्यासाठी महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया इनोव्हेशन अँड स्किल्स हब (MAISH) उभारण्यात येणार आहे. या हबच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण आणि आरोग्य क्षेत्रात संशोधन, नवकल्पना व कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत […]

अधिक वाचा..

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक […]

अधिक वाचा..

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, राहुलजींच्या सुरक्षेत वाढ करा

मुंबई: काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते प्रिंटो महादेवनने दिली असून हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..