आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई: आरक्षण व्यवस्था ही भारतीय संविधानाने सामाजिक न्याय आणि समान संधी या मूल्यांच्या आधारे ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समाजघटकांना शिक्षण व रोजगारामध्ये प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने निर्माण केली आहे. मात्र बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत आरक्षण व्यवस्थेचा विविध घटकांवर होणारा परिणाम वस्तुनिष्ठपणे तपासून […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे […]

अधिक वाचा..

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर ‘स्टेट ड्राईव्ह’मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून वीज ग्राहकांच्या तक्रारी, वाढत्या वीजबिलांचा मुद्दा आणि पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी त्यांच्या ‘स्टेट ड्राईव्ह’ या सदरातून स्मार्ट मीटर योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित करत ग्राहकांच्या हक्कांवर भाष्य केले […]

अधिक वाचा..

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत पक्षाने केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची […]

अधिक वाचा..

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा […]

अधिक वाचा..

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. सपकाळ म्हणाले की, डॉ. सप्तर्षी हे गांधी विचारांचे खरे पाईक होते. त्यांनी आयुष्यभर लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि […]

अधिक वाचा..

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा व काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना लक्ष्य करून कथित जादूटोण्याचा कट रचल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आयुबखान पठाण याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने एका मांत्रिकाच्या […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..

जगाचे नेतृत्व बदलले, पण भारताचे परराष्ट्र धोरण जुन्याच चौकटीत; प्रविण साहनींची मोदी सरकारवर टीका

अमेरिका–इराण युद्धानंतर जागतिक समीकरणे बदलल्याचा दावा; महाराष्ट्र काँग्रेसच्या चर्चासत्रात परराष्ट्र धोरणावर सखोल चर्चा मुंबई: अमेरिका–इराण युद्धानंतर जगातील शक्ती-संतुलनात मोठा बदल झाला असून जग आता द्विध्रुवीय नसून बहुध्रुवीय बनले आहे. मात्र, भारताने बदलती जागतिक समीकरणे ओळखण्यात अपयश आल्याने देशाच्या परराष्ट्र धोरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत, असा दावा संरक्षण व युद्धनीती विषयाचे आंतरराष्ट्रीय भाष्यकार प्रविण साहनी […]

अधिक वाचा..

शिस्तीतून विश्वासाचा प्रवास, वक्तशीरपणातून एसटीच्या नव्या युगाची सुरुवात

मुंबई: “रस्ते गावांना जोडतात; पण एसटी माणसांना जोडते.” ही भावना महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून आहे. लालपरी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नसून राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एसटी आजही […]

अधिक वाचा..