इथेनॉल मिश्रणावरून भाजप खासदारांची जीभ घसरली; म्हणाले…

मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका केली. रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. […]

अधिक वाचा..

शिवसेना खासदारांच्या विलिनीकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; ठाकरे गटाला स्थगितीची अपेक्षा, शिंदे गटाचे काय होणार?

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या सहा खासदारांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मान्यतेला ठाकरे गटाने दिलेले आव्हान न्यायालयासमोर आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. […]

अधिक वाचा..

पुण्याच्या वाहतूक कोंडीला मिळणार कायमचा ‘बायपास’! ५२ हजार कोटींचा रिंग रोड वेगाने मार्गी

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित पुणे चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. तब्बल ५२ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातून जाणाऱ्या अवजड आणि मालवाहतूक वाहनांना शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चांदणी चौक, नवले पूल, कात्रज घाट, हडपसर आणि अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

मोदींची सुप्रिया सुळेंसह ८ खासदारांची बैठक; पवार गटाच्या NDA प्रवेशाची कुजबुज; बैठकीत नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. पंतप्रधान […]

अधिक वाचा..

पुण्यात भाजपची भव्य तिरंगा रॅली; १५ ते २० हजार दुचाकींचा सहभाग? राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर म्हणाले…

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून […]

अधिक वाचा..

‘सिंदूर महारक्तदान’ला दिल्लीतील जवानांसाठी शिवसैनिकांचा सलाम; ८०० जणांचे रक्तदान

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ ही देशसेवा, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत प्रवास करून सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि शिवसैनिकांचे त्यांनी कौतुक केले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने […]

अधिक वाचा..

अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या ताटात निकृष्ट आहार? प्रयोगशाळा अहवालाने खळबळ; विजय वडेट्टीवार आक्रमक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता, काही पदार्थ निर्धारित मापदंडांनुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

धर्माच्या राजकारणात ओबीसींना अडकवून हक्कांचे प्रश्न दडपण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी […]

अधिक वाचा..

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजन पाटलांनंतर बाळराजे पाटलांचे नाव चर्चेत

मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढविता येणार नसल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पाटील कुटुंबाकडून बँकेच्या राजकारणाची धुरा आता लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या […]

अधिक वाचा..

फडणवीस-शिंदेंचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरातून थेट इशारा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे त्यांनी मराठा बांधवांना संबोधित करताना राज्य सरकार आणि सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. “तुमची लेकरं-बाळं संकटात आहेत. आता मराठा समाज संकटात सापडला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प […]

अधिक वाचा..