मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो,” असा ठाम आणि भावनिक संदेश उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सातारा जिल्ह्यातील अंगापूर पंचकोशीत आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळ्यात दिला. छोट्या गावांपासून दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. अंगापूर येथील प्राचीन हेमाडपंथी गणपती मंदिरात […]

अधिक वाचा..

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. “नारी शक्ती वंदन”च्या नावाखाली प्रत्यक्षात “सत्ता शक्ती वंदन” सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. २८ सप्टेंबर २०२३ रोजी १०६ वी घटनादुरुस्ती करून महिला आरक्षण कायदा मंजूर झाला, हे स्वागतार्ह असले तरी त्याचे संपूर्ण श्रेय […]

अधिक वाचा..

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गांधी भवन, कुलाबा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या प्रशिक्षण सत्रात मुख्य प्रशिक्षक म्हणून असद […]

अधिक वाचा..

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नसून भाजपच्या नेत्याचे वाटले, तसेच ते आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप केला. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपवर राजकीय हेतूने भाषण केल्याचा आरोप केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात […]

अधिक वाचा..

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. […]

अधिक वाचा..

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने नगरविकास विभागाने स्वतंत्र आणि परिणामकारक कार्यप्रणाली विकसित करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. दि. १६ एप्रिल रोजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्यानंतर […]

अधिक वाचा..

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक भेट उत्साहवर्धक ठरली. या वेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा विद्यार्थ्यांशी झालेला संवाद विशेष आकर्षण ठरला. डॉ. गोऱ्हे यांनी अत्यंत सोप्या भाषेत विधिमंडळाची कार्यपद्धती समजावून सांगताना शिस्त, नियम आणि सभागृहातील कामकाजाची रचना स्पष्ट […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल […]

अधिक वाचा..

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाईसह मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठी भाषेच्या अध्यापनासाठी २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या […]

अधिक वाचा..