दस्त नोंदणीच्या आधी जमीन मोजणी बंधनकारक; नोंदणी झाल्याशिवाय फेरफार नाही

औरंगाबाद: आता महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्री किंवा दस्त नोंदणी करण्याआधी जमिनीची मोजणी करणे बंधनकारक असेल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही नवी पद्धत लागू केली जाणार आहे. खासगी एजन्सीमार्फत जमिनीची मोजणी राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सी नेमल्या जाणार आहेत. या एजन्सींच्या भूकरमापकांमार्फत जमिनीची मोजणी केली जाईल. मोजणी पूर्ण झाल्यानंतरच दस्ताची नोंदणी […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन २०२६ पासून पुनर्संचयित होणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. २०२६ पासून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता प्रत्येक कर्मचाऱ्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे निवृत्तीनंतरचे उत्पन्न जुनी पेन्शन योजना (OPS) ही चिंता कमी करायची परंतु OPS बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आता पुन्हा OPS लागू झाल्याने […]

अधिक वाचा..

साक्षरतेच्या समान अधिकारा’चा आदर करून श्रीगणेशाचे आशीर्वाद व प्रसाद वाटण्याचा अनोखा मार्ग…

मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले . अंटार्क्टिका, कासा रिओ, […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात […]

अधिक वाचा..

सरकार मधील मंत्री बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकत आहे

नागपूर: सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अस मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्च्याची माहिती देण्यासाठी […]

अधिक वाचा..

नाशिक मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली गंभीर दखल

दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले निर्देश ठाणे: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे चार पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पत्रकारांना अमानुष मारहाण […]

अधिक वाचा..

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

संविधान सत्याग्रह यात्रेसाठी काँग्रेस पक्षाची समिती गठीत

मुंबई: महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नागपूरच्या दिक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची तयारी करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. […]

अधिक वाचा..

दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा; हर्षवर्धन सपकाळ

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा योगायोग असून दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करत […]

अधिक वाचा..

एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यात येणाऱ्या ८ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने १७४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार असून येत्या २ ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून […]

अधिक वाचा..