दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्रालयात […]

अधिक वाचा..

राजर्षी शाहू जयंती निबंध-काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; पत्रकार राजन पारकर यांना प्रथम क्रमांक

मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या निबंध व काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेला राज्यभरातील शाहूप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निबंध स्पर्धेत पत्रकार राजन पारकर (मुंबई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर काव्य स्पर्धेत अमित माने (कल्याण) यांना प्रथम क्रमांक आणि अमरसिंह जगदाळे (कोल्हापूर) यांना […]

अधिक वाचा..

स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा शासकीय जयंती यादीत समावेश करा; भुजबळ-मुश्रीफ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत सूचीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, […]

अधिक वाचा..

राम मंदिर देणगीप्रकरणी RSS ने संबंधितांना संघातून काढावे; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

मराठवाडा आढावा बैठकीत सरकारवरही जोरदार टीका; “दुबार पेरणी, दुष्काळ आणि बोगस बियाण्यांप्रमाणे बोगस सरकार” असा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील देणगीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांना संघातून निष्कासित करण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावी, […]

अधिक वाचा..

अमृत भारत योजनेतून बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट; सुनेत्रा अजित पवार यांचे मोदी-वैष्णव यांना आभार

मुंबई: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी […]

अधिक वाचा..

वारीत पुन्हा अपघात! भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले; चालक फरार

अहिल्यानगरातील रुईछत्तीशी शिवारात घटना; जखमी वारकरी जिल्हा रुग्णालयात उपचाराधीन अहिल्यानगर: पुण्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीवर झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच वारीदरम्यान आणखी एक अपघात घडल्याने वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २१ मधील वारकरी वसंतराव गावते यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी शिवारात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या […]

अधिक वाचा..

ठाणे होर्डिंग दुर्घटनेनंतर शिंदेंचा अॅक्शन मोड; अनधिकृत होर्डिंग हटवा, मोठ्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

ठाणे: ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी होर्डिंग दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटविण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्सवर त्वरित कारवाई करून बेकायदेशीर […]

अधिक वाचा..

जेजुरी दुर्घटनेनंतर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सत्यजीत तांबे

मुंबई: जेजुरी येथे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या मार्गांवर सक्षम आपत्कालीन आरोग्य व्यवस्था उभारण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहत त्यांनी भविष्यात अशा घटना घडल्यास तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज अधोरेखित केली. तांबे म्हणाले की, शिर्डी, पंढरपूर, जेजुरी, त्र्यंबकेश्वर […]

अधिक वाचा..

डॉ. सुकृत खांडेकर अमृतमहोत्सवी वर्षात; पत्रकारितेतील योगदानाचा गौरव

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि स्तंभलेखक डॉ. सुकृत खांडेकर यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. डॉ. खांडेकर यांनी केसरी, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती तसेच प्रहारसारख्या वृत्तपत्रांत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या […]

अधिक वाचा..

‘लाडकी बहीण’ नव्हे, ‘फसवणूक बहीण’ योजना; अमोल मातेले

मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ‘लाडकी बहीण’ नसून ‘फसवणूक बहीण’ योजना असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. मातेले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली […]

अधिक वाचा..