‘लाडकी बहीण’ नव्हे, ‘फसवणूक बहीण’ योजना; अमोल मातेले

मुंबई: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत राज्यातील ९२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही योजना ‘लाडकी बहीण’ नसून ‘फसवणूक बहीण’ योजना असल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. मातेले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी महिलांना आश्वासने देऊन त्यांची मते मिळवली […]

अधिक वाचा..

जेजुरी मार्गावरील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा संवेदनशील हस्तक्षेप; घटनास्थळापासून रुग्णालयापर्यंत घेतली धाव

पुणे: सासवड–जेजुरी मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच जखमींवर सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्यात यावेत आणि आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी पालखी […]

अधिक वाचा..
crime

भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; जेवणाच्या वादातून चाकू हल्ला

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून तिघा हल्लेखोरांनी हॉटेल मालक आकाश शेखर दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश दुबय्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

भाजप घरवापसीत रस नाही; शरद पवारांसोबतच राहणार; एकनाथ खडसे यांची स्पष्ट भूमिका

अमित शहांनी प्रवेशासाठी बोलावल्याचा दावा; राज्य भाजप नेतृत्वाने विरोध केल्याचा गौप्यस्फोट, गिरीश महाजनांवरही घणाघात मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये परत जाण्यात कोणताही रस नाही. मी शरद पवारांसोबत आहे आणि […]

अधिक वाचा..

साठे चौक रक्तरंजित! चाकूच्या सपासप वारांनी २१ वर्षीय तरुणाचा जीव घेतला

अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. मृत तरुणाचे नाव […]

अधिक वाचा..

सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही; कायदा-सुव्यवस्थेवर सतेज पाटील यांचा सरकारवर घणाघात

विधानपरिषदेत गुन्हेगारी, महिला सुरक्षा, पोलीस दलातील रिक्त पदे, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारला जाब मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारला आरसा दाखवणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही,” […]

अधिक वाचा..

MPSC भरती प्रक्रियेत व्यापमपेक्षा मोठा घोटाळा; ऑनलाइन परीक्षा रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेत मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. MPSC ची ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धत आणि Normalization तातडीने रद्द करून पारदर्शक ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. बेलापूर येथे MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसतर्फे सुरू […]

अधिक वाचा..

आईच्या संस्कारांमुळेच यशस्वी व्यक्तिमत्त्व घडते; मातृशक्तीचा गौरव समाजाचे कर्तव्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुरबाड: “प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने मुरबाड येथे आयोजित ‘आई महोत्सव-2026’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव […]

अधिक वाचा..

‘व्हीबी-जी राम जी’ कार्यशाळेला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती; ग्रामीण विकासाला नवी दिशा

मुंबई: विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) २०२६’ (व्हीबी-जी राम जी) कायद्यावरील कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता आहे. राज्याने […]

अधिक वाचा..

स्थानिक गुन्हे शाखेची बारामती, इंदापूर आणि पाटस परिसरात धडक कारवाई

तिघांना अटक करत चार गावठी पिस्तुले, सहा काडतुसे जप्त पुणे (प्रतिनिधी): अवैध अग्निशस्त्रे जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या कारवायांत ताब्यात घेतले. आरोपींकडून चार गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..