भारतीय जनता पक्ष चेटकीण, दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी खाण्याचा रोग जडला; हर्षवर्धन सपकाळ

दारु परवाने कंपन्यांसाठी खुले करण्यामागे पुण्याचे पालकमंत्री, Conflict of interest विचारात घेऊन उत्पादन शुल्क खाते काढून घ्या पुणे: भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे ५६ इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात पण तो दावा पोकळ आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून, धमक्या […]

अधिक वाचा..

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा 

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच शासन निर्णय काढून प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले. शेख […]

अधिक वाचा..

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय विभागाची कामे उशिराने होतात. सोबतच, अनेक कामं सांगूनही केली जात नाहीत. भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं म्हणणं आहे, त्यामुळे […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये १५० मालमत्तांवर फिरणार जेसीबी; बघा कोणत्या मालमत्ता होणार बाधित

संभाजीनगर: हर्सूलमध्ये जाणारा जुना जळगाव रोड आता २०० फुटांचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगररचना विभागाने मोजणी आणि मार्किंग सुरू केले असून, सुमारे १५० मालमत्ता पाडण्यात येणार आहेत. हर्सूल टी पॉइंट ते पाझर तलावापर्यंतचा रस्ता रुंद करणार महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (१५ जुलै) सकाळीच हर्सूलमध्ये येऊन रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी ३० मीटरची मोजणी […]

अधिक वाचा..

माझी इच्छा नव्हती, दोन पानी चिठ्ठी लिहून तरुणान संपवलं जीवन

सोलापूर: सोलापूर येथील दमाणी नगरातील पावन गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अरुण रोडगे व शकलेश जाधव यांच्या त्रासाला कंटाळून आनंद दादाराव शिंदे याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मृताची आई अंजना शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मृत आनंद व […]

अधिक वाचा..

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

डॉ. दीपक टिळक यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई: लोकमान्य टिळकांचे पणतू, केसरी’चे विश्वस्त-संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तित्व हरपले, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या. डॉ. दीपक टिळक यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

अधिक वाचा..

लुटारू आणि दरोडेखोर गँग विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

मुंबई: महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने असल्याने या […]

अधिक वाचा..

रितेश देशमुखवर कोसळला दु:खाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू…

मुंबई: अभिनेता रितेश देशमुखवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रितेशची सावली असलेल्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राजकुमार तिवारी असं त्यांचं नाव असून ते रितेशचे मॅनेजर होते. राजकुमार तिवारी केवळ रितेशचे मॅनेजरच नव्हते तर त्याच्या मोठ्या भावासारखे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने रितेशला खूप मोठा धक्का बसला आहे. रितेशनं पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त […]

अधिक वाचा..

बापानेच केली चार वर्षाच्या चिमुकलीची हत्या…

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. सावत्र पित्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. त्याचा कारण पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण ठरत होती. चिमुकली अशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येचा उलगडा झाला असून वरळीवरून आरोपी इम्रान शेखला अँटॉप हिल […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या कृषी मालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय बाजार धोरण आणणार

मुंबई: राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला अधिक व चांगला बाजार भाव मिळावा यासाठी लवकरच राष्ट्रीय बाजार धोरण आणणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य कृष्णा खोपडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूरमधील कामकाज प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. […]

अधिक वाचा..