अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ साठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरी-१ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांनी संबंधित महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

‘मिसिंग लिंक’ धोकादायक; भ्रष्टाचाराचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा; अनंत गाडगीळ

मुंबई: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी या प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी (ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीपत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागातील बोगद्यांच्या आतील भागाला मजबुती देण्यासाठी जाड काँक्रीटचे लायनिंग केले जाते. हे लायनिंग निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीच्या […]

अधिक वाचा..

पुण्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश; नागरिकांना सहकार्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या जीविताचे संरक्षण सर्वोच्च प्राधान्य मानून सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुनेत्रा पवार यांनी विभागीय आयुक्त, […]

अधिक वाचा..

अजितदादा पवारांच्या जयंतीनिमित्त २२ ते २६ जुलै ‘जनसेवा सप्ताह’

राज्यभर वृक्षारोपण, आरोग्य, महिला व शेतकरी उपक्रम मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर २२ ते २६ जुलै दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी, युवक, सामाजिक आणि अल्पसंख्याक समाजासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. ‘हरित महाराष्ट्र, वृक्ष माझी सावली, […]

अधिक वाचा..

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली […]

अधिक वाचा..

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुढील आदेशापर्यंत दोन्ही दिशांतील (पुणे–मुंबई व मुंबई–पुणे) वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे–मुंबई दरम्यानचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून […]

अधिक वाचा..

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू, साप आणि इतर किडे-किटक शिरण्याच्या घटना वाढत असतात. अशाच निष्काळजीपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथे 12 वर्षीय मुलाला पँटमध्ये लपलेल्या विंचवाने दंश केल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या उपचारांमुळे तब्बल 72 तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा जीव वाचला. अनुप ईश्वर […]

अधिक वाचा..

मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवर सरकारला धारेवर; जबाबदारांवर कारवाईची विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे […]

अधिक वाचा..

‘आई’ पर्यटन योजनेला पुणे विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद; १,७०० हून अधिक महिलांचे अर्ज

पुणे: पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची ‘आई’ पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत महिला उद्योजिकांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, पुणे विभागातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या माहितीनुसार, राज्यभरातून आतापर्यंत सुमारे ४ हजार […]

अधिक वाचा..