‘एनर्जी ड्रिंक’वर एफडीएचा मोठा दणका; पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह १०-१२ कंपन्यांना नोटीस

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या ‘सेव्ह ड्रग, सेव्ह फूड’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तथाकथित ‘एनर्जी ड्रिंक’ विकणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पेप्सिको, रेड बुल, स्टिंगसह १० ते १२ कंपन्यांना ३० जून रोजी नोटीस बजावण्यात आली असून, उत्पादनांवर ‘एनर्जी ड्रिंक’ असा उल्लेख करण्यास कायदेशीर परवानगी नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सचिव तुकाराम मुंढे […]

अधिक वाचा..

आंबेनळी घाट ४ दिवसांसाठी पूर्णपणे बंद; दरड, भूस्खलनाच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहेत. राज्यातील अतिधोकादायक […]

अधिक वाचा..

आंतरजिल्हा जबरी चोरी टोळीचा पर्दाफाश; तीन सराईत आरोपी जेरबंद, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात […]

अधिक वाचा..

सभागृहातील वक्तव्ये आणि जनतेच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचा अभाव चिंताजनक

मुंबई : एका सभागृहात “भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, फक्त परसेंटेज कमी असावं,” अशा स्वरूपाची वक्तव्ये झाल्याची चर्चा असताना, दुसरीकडे चेंबूर येथे शालेय बसवर झाड कोसळून एका चिमुकल्याचा मृत्यू आणि साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूसारख्या गंभीर घटनांवरही राजकीय टोलेबाजी आणि हशा झाल्याने लोकशाहीतील संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या दोन्ही घटनांमध्ये प्रशासनाने […]

अधिक वाचा..

२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा होणार; सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला राज्याचा गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून, जलसंधारण क्षेत्रातील सुधाकरराव नाईक यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा उद्देश आहे. मुख्यमंत्री म्हणून १९९१ ते १९९३ या काळात कार्यरत […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत […]

अधिक वाचा..

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या माध्यम समन्वयकांनी प्रसिद्ध केलेल्या मतलेखात म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली राबविला जात असला, तरी त्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा..

हत्ती–मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित करत सरकारने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा..

हाफकिनचे खासगीकरण होणार नाही; सरकारने सभागृहात दिली हमी

मुंबई: विधानसभेत हाफकिन संस्थेच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट सवाल उपस्थित करत संस्थेच्या खासगीकरणाच्या हालचालींवर तीव्र आक्षेप नोंदवला. वडेट्टीवार यांनी सांगितले की, हाफकिन संस्थेच्या खासगीकरणाचा विषय यापूर्वीही चर्चेत आला होता. सुरुवातीला सरकारने संस्थेची एक इंचही जमीन दिलेली नसल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर टाटा समूहाला संशोधन केंद्रासाठी पाच […]

अधिक वाचा..

संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाच्या निरीक्षणाची जोरदार चर्चा

मुंबई: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि हद्दपारीच्या कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांचे मूलभूत अधिकार अधोरेखित केले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती माधव जामदार यांनी “नागरिक गुलाम नाहीत” असे स्पष्ट निरीक्षण नोंदविल्याची चर्चा असून, पोलीस हे कोणत्याही सरकारचे […]

अधिक वाचा..