चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले. अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

नितीशकुमार राज्यसभेकडे; बिहारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता, भाजपचा मुख्यमंत्री?

पटना: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने बिहारमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट […]

अधिक वाचा..

आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? पंतप्रधान मोदींची बंगाल सरकारवर जोरदार टीका

बंगाल: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ऑल इंडिया ट्रेनमोल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनरजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनॅशनल संटल कॉन्फरेन्स चे ठिकाण अचानक बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्रपती […]

अधिक वाचा..

कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे बंडखोरांवर कारवाईचे संकेत; तीन नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस

गट स्थापनेत सहकार्य न केल्याचा ठपका; उत्तर न दिल्यास अपात्रतेची प्रक्रिया सुरू होणार मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील तीन बंडखोर नगरसेवकांविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित नगरसेवकांना ४८ तासांची अंतिम नोटीस देण्यात आली असून समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत […]

अधिक वाचा..

पत्र्याच्या घरातून राज्यसभेपर्यंत! गरिबी माझी कमजोरी नाही;  ज्योती वाघमारे यांचा संघर्षमय प्रवास

मुंबई: राज्यसभेच्या खासदारपदाच्या नव्या जबाबदारीसाठी सज्ज होत असताना शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या ज्योती वाघमारे यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा आणि राजकीय प्रवासाचा भावनिक उलगडा केला. साध्या कुटुंबातून शिक्षण आणि सामाजिक कार्याच्या जोरावर राज्यसभेपर्यंत पोहोचण्यामागील प्रेरणा आणि अनुभव त्यांनी स्पष्टपणे मांडले. माझे वडील पँथर चळवळीचे बुलंद कार्यकर्ते होते आणि आजही ते तसेच आहेत. संघर्षाची जिद्द आणि सामाजिक […]

अधिक वाचा..

पाचव्या प्रयत्नात यश; पाटणेच्या धनश्री अहिरेला यूपीएससीत ४८९ वा क्रमांक, आयपीएस पदावर झेप

मालेगाव: तालुक्यातील पाटणे येथील धनश्री जिभाऊ अहिरे हिने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशातून ४८९ वा क्रमांक मिळवत आयपीएस पदावर झेप घेतली आहे. पाचव्या प्रयत्नात मिळवलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. धनश्रीचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाटणे येथील पंडित जवाहरलाल […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते शिरूर सहापदरी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरूवात…

पुणे : पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे प्रकल्पाला अखेर अर्थसंकल्पीय निधीची जोड मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १४,८८६ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. महामार्ग हा २४५.९ किमी लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्हिजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. […]

अधिक वाचा..

विकसीत महाराष्ट्र २०४७ चे गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत […]

अधिक वाचा..