बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; ग्रॅच्युईटी, वेतनवाढ आणि ५ हजार नव्या बसांचा निर्णय

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात अदा करण्याचे मान्य करण्यात आले असून, नवीन वेतन करार होईपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा ३,००० रुपये […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education⁠ यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल […]

अधिक वाचा..

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला (RMC) भेट देत पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हवामान तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यातील पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत माहिती घेतली. हवामान केंद्रातील तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी जय पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. नायर, सौ. […]

अधिक वाचा..

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास मुंबई : शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “रक्ताचं नातं सांगून किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसैनिकच […]

अधिक वाचा..

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे. तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक […]

अधिक वाचा..

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत यंदा बोरिवली (पूर्व) येथील अभिनव विद्यामंदिरातील २०५ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके आणि शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार समारंभात पार पडला.यावेळी ट्रस्टचे विश्वस्त सुरेश डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत जोशी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब […]

अधिक वाचा..

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी “ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?” या शीर्षकाची एक व्यंगात्मक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. पोंगडे महाराज यांच्या व्हायरल पोस्टमधील मांडणी आणि रूपकात्मक संदर्भांवर आधारित हा स्वतंत्र लेख असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या लेखात राजकीय पक्षांतील फूट, नेत्यांची पक्षांतराची भूमिका, सत्तेसाठी होणारी कथित फोडाफोड आणि लोकशाहीतील […]

अधिक वाचा..

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशीच नव्हे, तर महाविकास आघाडीशी आणि जनतेशीही केलेली गद्दारी असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. महायुतीच्या विरोधात जनतेने मतदान करून या खासदारांना विजयी केले होते. त्यामुळे त्यांच्या या कृतीला जनतेचा विश्वासघात मानत अशा गद्दारांना […]

अधिक वाचा..

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच हे खासदार लोकसभा अध्यक्ष Om Birla यांची भेट घेऊन […]

अधिक वाचा..