पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करु; अँड आशिष शेलार

मुंबई: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अशी शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. विधान परिषदेमध्ये आमदार श्रीकांत भारतीय यांनी आज लक्षवेधी […]

अधिक वाचा..

मोदी पंतप्रधान तोपर्यंत मी मंत्री; रामदास आठवले यांचा मोठा दावा

पुणे: रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाबाबत मोठा दावा केला आहे. “मी ज्यांच्यासोबत असतो, ते सत्तेत येतात; आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेन,” असे वक्तव्य त्यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले यांनी धुळे येथे झालेल्या सभेत हे विधान केले. […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणारे तिघे जेरबंद

मुंबई: इंस्टाग्रामवर मित्रांसोबत चॅट करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून वडिलांनी मारहाण केल्यानंतर घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय मुलाला नोकरीचे आमिष दाखवून राजस्थानात नेणाऱ्या तिघांना अखेर दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणातील तक्रारदार हे चालक असून ते कुटुंबासह गोरेगाव परिसरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा स्थानिक खासगी शाळेत शिक्षण घेतो. […]

अधिक वाचा..

मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीची ‘घरवापसी’; पिंपरी-चिंचवडमध्ये विधीवत शुद्धीकरण

पिंपरी-चिंचवड: २०१९ मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेल्या सायली सुर्वे हिने पतीपासून वेगळे होत पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड येथे होम-हवन आणि मंत्रोच्चार करून शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडली. या कार्यक्रमाला काही लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सायली सुर्वे हिने २०१९ मध्ये Mira-Bhayandar येथील उद्योजक […]

अधिक वाचा..

महिला दिनानिमित्त ‘महिला कला महोत्सव २०२६’ ची उत्साहात सांगता

मुंबई: महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला कला महोत्सव २०२६’ या महोत्सवाची उत्साहात सांगता झाली. रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ मार्चदरम्यान पार पडलेल्या या महोत्सवातील विविध नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महोत्सवात विविध […]

अधिक वाचा..

जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून एचपीव्ही लसीकरण आणि ‘पिंक ओपीडी’चा शुभारंभ

मुंबई: राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसेच ‘पिंक ओपीडी’चा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे झाला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, बदललेल्या आहारपद्धतीत आणि वाढत्या तणावामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढताना दिसत […]

अधिक वाचा..

गृहस्वामिनी गॅसवर! महिलादिन तर रोजचाच… अशी महागाई नको सरकार!

मुंबई: देशाचा असो की राज्याचा अर्थसंकल्प, कुटुंबाचे बजेट सांभाळणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात गृहस्वामिनीचे लक्ष सर्वप्रथम कशाकडे असते? कांदा, बटाटा, भाजीपाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅसच्या किमतीकडे. आजही प्रत्येक घरात महागाईचा भडका किती वाढणार याचीच चर्चा आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दरातील चढ-उतारावरही सर्वसामान्यांचे लक्ष आहे. प्रश्न अनेक आहेत… पण उत्तर एकच दिले जाते […]

अधिक वाचा..

कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं हेच शिवसेनेचं वचन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. बाळासाहेबांनीही अठरा पगड जातींना एकत्र केलं, तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदं देऊन बळ दिलं. बाळासाहेबांचे स्वप्न आणि विचाराने शिवसेना पुढे जातेय. शिवसेना वाढवण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला न मागता दिलं जातं, हे शिवसेनेचं वचन आहे, असे प्रतिपादन शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरत शतकानुशतके चालत आलेली परंपरा यंदाही जपली. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ‘श्रीखंड्या’ या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण […]

अधिक वाचा..

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात […]

अधिक वाचा..