देशाचे पहिले शक्तीपीठ मोदी, दुसरे शक्तीपीठ अमित शाह; एकनाथ शिंदे

इचलकरंजी: देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार केला तर पहिले शक्तीपीठ म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे शक्तीपीठ म्हणजे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. मोदी यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेले, तर अमित शाह यांनी देशाची सुरक्षा आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी […]

अधिक वाचा..

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात उच्च न्यायालयात अपील; अमित शाह यांचे सीबीआयला निर्देश; एकनाथ शिंदे

कोल्हापूर : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्याशी चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी केली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल […]

अधिक वाचा..

अंबाबाई मंदिराच्या १५०० कोटींच्या विकास प्रकल्पाचा शुभारंभ; कोल्हापुरात ‘विकासाची पंचगंगा’ वाहणार; एकनाथ शिंदे

कोल्हापूर: श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या आधुनिकीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे कोल्हापूरला जागतिक धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर नवे स्थान मिळेल आणि शहरात “विकासाची पंचगंगा वाहणार” असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी सांगितले की, अंबाबाई मंदिराचा विकास प्रकल्प […]

अधिक वाचा..

जनादेशाचा बाजार, संविधानावर घाव; पक्षफोडीच्या राजकारणावर काँग्रेसची टीका

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक ॲड. श्रीनिवास बिक्कड यांनी जनादेशाची पायमल्ली, पक्षफोडीचे राजकारण आणि संविधानिक संस्थांच्या भूमिकेबाबत भाष्य करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून जनतेच्या विश्वासाची आणि जनादेशाच्या पवित्रतेची व्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’सारख्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी निवडून […]

अधिक वाचा..

MIFF 2026 मधील मराठी लघुपट व माहितीपट महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी लघुपट आणि माहितीपटांच्या विशेष महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आयोजित या महोत्सवात निवडक १९ मराठी लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन सुरू आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डिअर २०२’, ‘१७ वे वर्ष’ या लघुपटांसह ‘फड’ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात गैरव्यवहाराचा आरोप; चौकशीची मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी विकासाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणात मोठ्या अनियमिततेचा आरोप समोर आला आहे. पदानुसार निश्चित करण्यात आलेले वेतन आणि प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेंडर क्लार्क, टॅली ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, […]

अधिक वाचा..

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला; आमदार सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र आक्षेप घेत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तांबे यांनी सांगितले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगरसाठीच नव्हे, […]

अधिक वाचा..

राहुल गांधी यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गिग वर्कर्सना मोफत पेट्रोल वाटप मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्या कार्यावर आधारित ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस […]

अधिक वाचा..

महायुती सरकारची विक्रमी कामगिरी; विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, कष्टकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विक्रमी निर्णय घेतले आहेत. विरोधकांनी बहिष्काराचे राजकारण सोडून सभागृहात येऊन विधायक चर्चा करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी कर्जमाफी, शेतकरी मदत, लाडकी बहीण योजना, उद्योग गुंतवणूक, […]

अधिक वाचा..

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सांगत, महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध पावले […]

अधिक वाचा..