विकसीत महाराष्ट्र २०४७ चे गुलाबी स्वप्न दाखवून लाडक्या बहिणींना पुन्हा फसवले

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत […]

अधिक वाचा..

राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शेती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यांना प्राधान्य देत “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात […]

अधिक वाचा..

प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, म्हणूनच दररोज शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे आहे, असा टोला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. उबाठा गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी […]

अधिक वाचा..

पुण्यात पशुवैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर भर; पशुसंवर्धन विभागाच्या यशोगाथा सोशल मीडियातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन पुणे: पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पशुवैद्य, तज्ज्ञ आणि प्रगतशील पशुपालकांचा गौरव ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र’तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आला. औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या विकास व्हिजनला समर्पित अर्थसंकल्प; शेतकरी, रोजगार व पायाभूत सुविधांवर मोठा भर; धनंजय मुंडे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विकासाच्या व्हिजनला समर्पित असून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या दूरदृष्टीला समर्पित अर्थसंकल्प; विकसित महाराष्ट्राचा पाया; सुनिल तटकरे

मुंबई: यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा ठरल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे […]

अधिक वाचा..

हा महाराष्ट्राचा नव्हे, MMRDA चा अर्थसंकल्प;  विजय वडेट्टीवर यांची सरकारवर उपरोधिक टीका

मुंबई: विधानसभेत सादर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचा आणि आकड्यांचा मारा असून त्यातून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, असा टोला लगावत त्यांनी सरकारवर उपरोधिक निशाणा साधला. अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

UPSC 2025 मध्ये ‘मनोबल’चा दबदबा! 19 विद्यार्थ्यांचे यश; दृष्टिबाधित रवी राज दिव्यांगांमध्ये देशात अव्वल

8 दिव्यांग विद्यार्थ्यांची कर्तबगारी; सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या UPSC 2025 नागरी सेवा परीक्षेत दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यामध्ये 8 दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दृष्टिबाधित रवी […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

मुंबई: मुंबईतील आघाडीच्या दैनिकांमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संजीवन ढेरे (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील कुच्ची गावाहून मुंबईतील माझगाव येथे स्थायिक झालेल्या ढेरे यांनी काही काळ हिंदुस्थान लेव्हर या कंपनीत नोकरी केली होती. आपल्या मिश्कील आणि हजरजबाबी स्वभावामुळे ते कंपनीत […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र नव्हे, घोषणांचा महाराष्ट्र! राज्याच्या अर्थसंकल्पावर अमोल मातेले यांची घणाघाती टीका

मुंबई: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून “घोषणांचा महाराष्ट्र” घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प “नाव मोठे […]

अधिक वाचा..