बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा, महानगरपालिकेच्यावतीने गुरुवारी कवि संमेलनाचे आयोजन

पनवेल: जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता मान्यवर कवींच्या कवि संमेलनाचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे. मराठी भाषेचे सौंदर्य,काव्य सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या “जागर मराठीचा –जल्लोष कवितेचा” या कार्यक्रमामध्ये उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करायला लागणारे महाराष्ट्राचे दिग्गज […]

अधिक वाचा..

शिवसेनेची दहशत नाही, तर दरारा असला पाहिजे 

‘संघटन, प्रशिक्षण, सभासद नोंदणी आणि ४थे महिला धोरण’ यावर भर देत, नाशिक येथे महिला सक्षमीकरणासाठी बैठक संपन्न  नाशिक: शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बैठक घेतली. या बैठकीत महिलांचे संघटन, त्यांची व्होट बँक तयार करणे आणि सभासद नोंदणी मोहीम राबवण्याचे महत्त्व यावर चर्चा झाली. याप्रसंगी […]

अधिक वाचा..

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच

मुंबई: दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया […]

अधिक वाचा..

गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे

पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड, पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट

मुंबई: महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई: वाचनाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया” च्या सहयोगाने दि.५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.), तिसरा मजला, शारदा मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (दि. ५) फेब्रुवारी रोजी सकाळी […]

अधिक वाचा..

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

मुंबई: मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होण्याबरोबरच शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यात मदत होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी या सर्वांनी या प्रणालीसाठीची आवश्यक नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ होईल, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख […]

अधिक वाचा..

मराठी भाषा संवर्धनासाठी ठोस पावले उचलणार; मंत्री उदय सामंत

मा. राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न’ पुरस्कार प्रदान पुणे: मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित विश्व मराठी संमेलन २०२५ चा सांगता समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते रितेश देशमुख, अभिनेते सयाजी शिंदे, साहित्यिक […]

अधिक वाचा..

कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार’ डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर

कोल्हापूर: ‘शब्दगंध साहित्यिक परिषदे’च्या वतीने तत्कालीन मार्गदर्शक कॉ. गोविंदभाई पानसरे यांच्या नावाने दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘प्रबोधन पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार शाहूनगरी कोल्हापूरचे लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना जाहीर करण्यात आला आहे. (दि.९) फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी […]

अधिक वाचा..