फेब्रुवारीत दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे’ आयोजन

मुंबई: राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव राबविण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्याचा ५ व ६ फेब्रुवारीला ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आज जिल्हा समन्वय समितीची […]

अधिक वाचा..

येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता….

मुंबई: एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी ५००० या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री.अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली. सन. २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा […]

अधिक वाचा..

महिलांच्या विषयावर देश पातळीवर एकत्र काम करण्यासाठी महाराणी राधिका राजे यांनी केले आश्वासीत…

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर घेतली महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट वडोदरा: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वडोदरा दौऱ्यावर महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीत सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. वडोदऱ्याच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या महाराणी राधिकाराजे गायकवाड या सामाजिक कार्यातही सक्रिय असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव

सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई: भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या […]

अधिक वाचा..

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या; अँड.अमोल मातेले

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड. अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारच्या गोंधळामुळे जनता हैराण “परिवहन मंत्र्यांनी जर भाडेवाढीचा निर्णय घेतला नसेल, तर मग हा निर्णय कोण घेतो? […]

अधिक वाचा..

‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आनंद व्यक्त

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मपुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, […]

अधिक वाचा..

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई: विधान भवन, मुंबई येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

हा देश प्रत्येक देशवासियाचा…

मुंबई: देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची आहूती देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य केवळ […]

अधिक वाचा..

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी योजना महिलाकेंद्री दृष्टीकोन आवश्यक

पुणे: स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्त (२५ जानेवारी २०२५) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४ थे महिला धोरणातील मुद्द्यांवर प्रत्यक्षात काम करत असताना महिलांना कसा उपयोग करता […]

अधिक वाचा..

मतदारांची माहिती लपवणे लोकशाहीसाठी घातक

झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा: नाना पटोले मुंबई: लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून […]

अधिक वाचा..